*टाइम्स पब्लिक स्कूल एसएससी बोर्ड परीक्षेत अव्वल...!!!* उदगीर- शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर व एक पाऊल पुढे हा वसा संपादन करणाऱ्या टाइम्स पब्लिक स्कूलने यावर्षीही एस.एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले. मार्च 2023-24 या वर्षी पार पडलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून इंग्रजी माध्यमाच्या टाइम्स पब्लिक स्कूलचा निकाल 100% लागला आहे. यात 93 विद्यार्थ्यांपैकी 36 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण , 93 विद्यार्थ्यापैकी 76 विद्यार्थ्यांनी 75% पेक्षा अधिक गुण, तर 17 विद्यार्थ्यांनी 45% ते 75% गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे. श्रद्धा जाधव व अलोक मालू याने 100% गुण घेऊन शाळेतून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच जळकोटे श्रावणी या विद्यार्थिनीने 99.60% गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर प्रांजली वट्टमवार हिने 99.20% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशा प्रकारे शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे!या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वरप्रसाद बाहेती, सचिव मा. श्री मा.विजयकुमार कप्पिकेरे , कोषाध्यक्षा मा.सौ. मंगला कप्पिकेरे, इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री अभिजीत नळगीरकर, सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Popular posts
राठीज क्लासेस तर्फे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संपन्न उदगीर= येथील संतोष राठी यांचे प्रसिद्ध राठीज क्लासेस तर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव विशाल बहात्तरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन, उदगीर,डॉ. राजकुमार प्रेमसुखं नावंदर प्राचार्य, संत तुकाराम लॉ कॉलेज, उदगीर,प्रा. ऍड. दिप्ती राजकुमार नावंदर, संत तुकाराम लॉ कॉलेज, उदगीर,श्रीनिवास सोनी,वरिष्ठ पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आला,यात खुशी गोविंद ईनाणी - 97.4 %,वैष्णवी गुडाळे 95.4 %, राघव मणियार 94.2 %,पीयूष गुप्ता -93 %,प्रतीक बेंद्रे - 90% ,हर्षद वाडेकर - 89%, ऋतुजा बेडके - 89 %,सौरुद्र नागरगोजे - 89 %,सुयश कल्लूरकर - 89%,जान्हवी बिरादार - 87%,साईनाथ पदमवार - 85.2,सुयश बिरादार - 85.2%,अंकिता स्वामी 85,ऋचा मोदानी - 84%,भार्गव मसगले - 83 %, शरयू कौठाळे - 82 %,नागेश चांडके -82 %,प्रथमेश बेलकोने - 81% ,अनुश्री उद्तेवार - 80 %,सुमेध बोंद्रे - 81%,प्राची वाघमारे - 81%,दिव्या हैबतपुरे - 80%, अथर्व बिरादार - 80.2 %,अथर्व शेटकार- 81%,दीक्षा रणदिवे - 79.80 %,दीक्षा हैबतपुरे - 77%,पिंजारी महबूब - 76.70,प्रणव बेंद्रे - 81.40,श्रेयस माने - 77 या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले या वेळेस पोलिस निरीक्षक बारहत्ते यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाची मान उंचावेल असे काम करावे,प्रशासकीय सेवेत यावे, ॲड डॉ राजकुमार नावंदर यांनी दहावी नंतर पुढे कोणकोणते क्षेत्र आहेत याची माहिती दिली तर पत्रकार श्रीनिवास सोनी यांनी पालकांनी आपल्या मुलाची आवड जाणून त्या क्षेत्रात पाठवावे ,विनाकारण पाल्यावर डॉक्टर, इंजिनियर हो म्हणून दबाव घालू नये असे अनेक क्षेत्र आहेत की ज्यात उज्वल यश कीर्ती मिळते,प्रास्ताविक सौ राठी यांनी केले पालकांनीही राठी क्लासेस चे आभार मानले
Image
साहेबांचा वचक संपला का अधिकाऱ्यांनी ओळखली पोती? 👉 उदगीर तालुक्यातील अधिकारी निर्ढावले,यांच्यावर वचक कोणाचा उदगीर:- तालुक्यातील अनेक कार्यालयात सध्या अंधेरनगरी चालू असून ही या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कोणीच आवाज उठवत नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत असून अनेक जण तर साहेबाचा वचक संपला तर काही जण अधिकाऱ्यांनी साहेबाची पोती ओळखल्याचे बोलताना दिसत आहेत उदगीर तालुक्यातील अनेक कार्यालयात सध्या अंधेर नगरी चौपट राज दिसत असून येथील अधिकारी हे स्वतःस हुकूमशाह सारखे वागताना दिसत आहेत,महसूल विभागाकडे कुठलीही तक्रार करा त्या तक्रारीस कचऱ्याच डब्बा दाखवला जात आहे कारण की या तक्रारीत या विभागाचा कोणी अधिकारी ,कर्मचारी अडकत असल्याने वरिष्ठ त्यास वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे दिसून येते,दुसरीकडे नगरपालिकेत सध्या प्रशासक राज्य चालू असून दोन दोन महिने टेंडर फ्लॅश होऊन ही टेंडर सुटत नाही,पुढे पावसाळा असल्याने कामे होतील कसे हे प्रशासक आणि तेथील अधिकाऱ्यांनाच माहित,शहरात अनेक ठिकाणी भूमिगत ड्रेनेज चे काम चालू असून हे काम किती उत्कृष्ट होत आहे हे जाणून घेण्यासाठी उदगीरकर उत्सुक असून ही त्याची माहिती मिळत नसल्याचे दिसते,शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढत असताना नगरपालिकेचा अतिक्रमण हटाव पथक गायब असल्याचे चित्र दिसत आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भिंतीला तडे गेल्याने त्यांचे काम किती उत्कृष्ट झाले याचे प्रमाणपत्र देणे शिल्लक राहिलेले दिसते,तालुक्यातील नवीन निर्मित रस्त्याची वाट लागल्याचे दिसते,शहरात भर चौकात मटका,गल्लीत दारू शहरात अवैध धंद्यांना ऊत आले असतांनाही पोलिस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे, उदगीर ला आर टी ओ कार्यालय व्हावे अशी उदगीर कराची इच्छा होती ती पूर्ण झाली खरी पण येथील अधिकारी सकाळ संध्याकाळ रिंग रोड,मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडून अवैध वसुली करत असल्याने उदगीर शहरातील व्यापारावर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत, हे सर्व होत असताना साहेब गप्प का बसले आहेत हे जनतेला कळत नाही ,साहेबाची अधिकाऱ्यावरची वचक संपली ? अधिकाऱ्यांनी साहेबाची पोती ओळखली अशी चर्चा नगरपालिकेसमोर जनता करताना दिसत आहे
Image
उदगीर शहर परिसरात मटक्याच्या सुळसुळाट,अनेक परिवार उध्वस्त? 👉 जिल्ह्यात अवैध धंद्याचा नायनाट म्हणणारा पोलिस विभाग मूग गिळून गप्प ? उदगीर:- उदगीर शहर व परिसरात सध्या अवैध धंद्याचे बस्तान असून ही पोलिस विभाग मूग गिळून गप्प असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र असून मटक्याने तर कहरच केले असून गल्ली बोळात राजरोस मटका चालू असल्याचे चित्र दिसत आहे उदगीर शहर एक ऐतिहासिक ,शैक्षणिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे पण मागील काही दिवसापासून शहर व परिसरात अवैध धंद्याचे बस्तान बसले असून शिवाजी चौक,बस स्टँड समोर खुलेआम मटका घेतला जात असताना अवैध धंदे जिल्ह्यात चालणार नाही अशी वल्गना करणारे आता गप्प का झाले ,कोणत्या मटकेवाल्यान यांना मॅनेज केले ही चर्चा शहरात जोरात चालू आहे,एकीकडे शहरातील कुठल्याच अधिकाऱ्यावर कोणाचेही अंकुश नसल्याचे चित्र दिसत असून शहरात रेती माफिये,मटका माफियांचे राज्य सुरू झाले का हा प्रश्न सामान्यांना पडत असून सध्या शहरातील अनेक कार्यालयात दलालांचे राज्य असल्याचीही चर्चा असून या अशा बाबींमुळे उदगीर शहराचे नाव बदनाम होत असून या अवैध धंद्यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी सामान्य जनता करत आहे
Image
पत्रकार दत्ता पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हनुमंत घोणसे वर गुन्हा दाखल उदगीर: देवणी येथील दै. देशोन्नती चे तालुका प्रतिनिधि दत्ता पाटील रा.तळेगाव ता.देवणी यांना दारूची बातमी छापल्याचा कारणा वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात होती या प्रकरणी पत्रकार सौरक्षण कायद्यानुसार देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतीत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गेल्या आठवड्यात देवणी तालुक्यातील अवैध देशी दारू जप्त केल्याची बातमी दैं. देशन्नती या दैनिकात प्रकाशित झाली होती. याचा राग मनात धरून माझ्या मुलाची बदनामी करतो का म्हणुन आर्वाच भाषेत शिवागाळ करत परिवारास जिवे मारण्याची धमकी हनुमंत रंगराव घोणसे यांनी पत्रकार दत्ता पाटील यांना दिली होती,या प्रकरणी देवणी पोलिसात पत्रकार दत्ता पाटील यांनी तक्रार दाखल करताच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार हनुमंत रंगराव घोणसे रा. तळेगाव ता. देवणी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबतचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक याच्या कडून करण्यात येत आहे.या धमकीचा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने सर्वात पहले निषेध नोंदवला होता.
बीदर जिल्हा मराठी पञकार परिषदेच्या अध्यक्षपदी दयानंद बिरादार तर सचिव पदी दत्तात्रय साबणे यांची निवड उदगीर:-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि.५) भालकी जि. बीदर येथे जनार्धन बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पञकाराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत परिषदेचे चिटणीस सचिन शिवशेट्टे यांनी बीदर जिल्हा मराठी पञकार परिषदेची कार्यकारणी जाहीर केली. यात अध्यक्षपदी दयानंद बिरादार, कार्याध्यक्ष तुकाराम मोरे, उपाध्यक्ष दत्तात्रय स्वामी, सचिव दत्ताञय साबने, सहसचिव प्रा. सौ. मिनाक्षीताई पाटील, कोषाध्यक्ष मन्मथ स्वामी कार्यकरिणी सदस्य म्हणून अंकुश वाडीकर, विद्यासागर पाटील, महेश हुलसूरकर, तुकाराम शेडोळे, विनायक शिंदे सल्लागार सदस्य म्हणून माधव पिचारे, पी.आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीची निवड झाल्याबद्दल मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख सह उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.. येत्या कार्यकाळात जास्तीत जास्त पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली येतील आणि पत्रकारांचे प्रश्न आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा श्री.एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
Image