देशमुखाना जागृती शुगर सभासद दाखवणार इंगा.. बस्वराज रोडगे 👉 शेतकऱ्याच्या 25000 रुपयाचे शेअर्स वर 10 वर्ष मलिदा घेतला, शेतकऱ्याच्या पैश्यावर कारखाना कर्ज मुक्त केला, आता जबरन शेअर्स परत घेउन 500 रू बाँड घेऊन डीपॉझिट होल्डर केले मग हे शेतकऱ्याचे कैवारी कसे:- बस्वराज रोडगे उदगीर:-अमित देशमुख यांना खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर उसाचा एफ आर पी क्विंटल ला 340 रुपये प्रमाणे दिनांक 7/5/ 24 च्या आत देऊन शेतकऱ्याप्रती आपुलकी दाखवावी यंदा ऊस उतारा तेरा आला आहे प्रतिक्विंटल 340 रुपये प्रमाणे प्रति प्रति टन 4420 रुपये कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर 30 दिवसाच्या आत बिल देणे बंधनकारक असते. पण अद्याप दीड महिना झालं कारखाना बंद होऊन आणखीन एफ आर पी प्रमाणे बिल निघालेली नाही .फक्त उचल देण्यात आली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जागृती कारखान्याने शेतकऱ्याकडून 25 हजार रुपये चा शेअर्स बँकेकडून कर्ज घेऊन भरून घेतला होता त्या शेअर्सचे व्याज शेतकऱ्यांनी भरले शेतकरी आणखीन त्या कर्जातून बाहेर निघाला नाही आणि तो शेअर्स शेतकऱ्याकडून 500 रुपयांच्या बॉण्डवर जबरदस्तीने सह्या घेऊन त्यांना डिपॉझिट होल्डर केले. आहेत काही शेतकरी बॉण्ड न देण्याच्या मनस्थितीत होते त्यांना तुमचा ऊस नेणार नाही अशी धमकी दिली आपला ऊस शेतात तसाच राहील या भीतीपोटी शेतकऱ्याने त्यांना पाचशे रुपयांच्या बॉण्ड वर सह्या दिल्या दिलीपराव देशमुखाणि शेतकऱ्याची निरघूण हत्या केली आहे . कारखान्यावरील 11000 शेअर्स होल्डर चे 500 रुपये प्रमाणे शेतकऱ्याला खर्च करायला लावून एकंदरीत 55,00,000 रुपयांना शेतकऱ्याला खड्ड्यात घातला आणि तुमच्या स्वार्थापायई आपण त्यांना डिपॉझिटर केलात कारखाना तर शेतकऱ्यांच्या शेअर वर उभा केलात. देशात सर्वात मोठी फसवेगिरी जागृती कारखान्याने केली आहे . ही गोष्ट या कारखान्याचे शेर होल्डर जनता कदाचित विसरणार नाही. त्या सर्व शेतकऱ्यांचे 500 रुपये त्यांना करायला लावलेला खर्च परत द्यावे आणि त्यांना पूर्वीप्रमाणे शेअर होल्डर कायम ठेवावे तरच तुम्ही जनतेला मत मागण्याच्या लायकीचे राहाल अन्यथा तुम्हाला जनता मत देणार नाही. साखरेला भरपूर भाव असताना शेतकऱ्याचे बिल का देत नाहीत ? तुरीला भरपूर भाव आहे हरभऱ्याला भरपूर भाव आहे ते का सांगत नाहीत सोयाबीनचा भाव हा जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतो सोयाबीन हे सर्व देशांमध्ये कमी भावाने विक्री होत आहे पण तुम्ही धुळफेकरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जबाबदार धरत आहात असा कुटील डाव रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करत शेतकऱ्यांना देशोधडीस लावत आहात. दिशाभूल करणे थांबवा आता शेतकऱ्याला फसवणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणे गरजेचे आहे, शेतकऱ्यांनी भाजपाला साथ द्यावी असेआवाहन त्यांनी केले आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image