*उदयगिरी अकॅडमीची SSC बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी* उदगीर: उदगीर शहरातील अग्रगण्य शैक्षणिक चळवळ उदयगिरी अकॅडमीतील संकेत कमलापुरे या विद्यार्थ्याने 100% गुण मिळवून लाल बहादूर शास्त्री शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे, तसेच माधव जाधव(99.80%), सायली सावळे (99.40%),पार्थ केंद्रे (99.40%), अंकिता खांडेकर (99.20%), प्रिया गायकवाड (99%), गायत्री गव्हाणे (99%), रोहन पाटील (98.80%), सिद्धेश्वर जायभाये (98.40%), सिद्धारामेश्वर वडले(98.20%), श्रेयस आचार्य (98%), अथर्व धोंगडे (98%), अमित बिरादार (98%) अश्या एकूण 31 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा अधिक गुण व 49 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. गणितात 100 पैकी 100 घेणारे 2 विद्यार्थी तर 100 पैकी 99 गुण घेणारे 8 विद्यार्थी , Science मधे 100 पैकी 100 घेणारा 1 तर 100 पैकी 99 गुण घेणारे 3 विद्यार्थी, इंग्रजीत 100 पैकी 98 व 97 घेणारे 3 तर संस्कृतमधे 100 पैकी 100 घेणारे 9 विद्यार्थी आहेत. या सर्व गुणवंतांचा सत्कार प्रमुख पाहुणे प्रा.शिवराज अंबूलगे, प्रा. देवीदास खिंडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. संतोष पाटील, प्रा.डॉ धनंजय पाटील, प्रा. ज्योती खिंडे, प्रा.मीनाताई हुरदळे, प्रा. श्रीगण रेड्डी, प्रा.नंदिनी नीटूरे, प्रा. निवेदिता भंडारे ,प्रा.गोविंद केंद्रे आदींनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा फेटे बांधुन सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image