विद्यार्थ्याची फिस घेऊंन प्राध्यापक फरार 👉देवानीच्या विवेकवर्धिनी महाविद्यालयात Ycmou चे प्रवेश प्रक्रियेसाठी 80 विद्यार्थ्यांचे शुल्क घेऊन प्राध्यापक महादेव बीजापुर फरार- ABVP चे ठिय्या आंदोलन. उदगीर- देवणी येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चे शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या BA, BCOM च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक महादेव बीजापुरे फरार झाला तर महाविद्यालय प्रशासन या घटनेवर उडवाउडवी चे उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली 75 वर्ष झाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करते. देवणी येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चे केंद्र असून शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या BA, BCOM च्या 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक महादेव बीजापुरे फरार झाले आहेत. विद्यार्थ्याचे परिक्षा तोंडावर आली असून महाविद्यालय प्रशासन या घटनेची आम्हाला काहीही माहिती नाही यावर उडवाउडवी चे उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने आंदोलन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे आणि दोषी प्राध्यापकांवर त्वरित कार्यवाही करुन निलंबन करण्यात यावे अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाला कऱण्यात आली. यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सर्व मागण्या मान्य करुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे हमीपत्र देण्यात आले. यावेळी अभाविप लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी, लातूर महानगर मंत्री सुशांत एकुर्गे, अक्षय स्वामी, अभिषेक स्वामी, ओमकार पोतदार, अविनाश चेपटे, रोहित कांबळे सह अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती विशाल स्वामी यानी दिली आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image