*लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी लातूर प्रशासन सज्ज; मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई* 👉 सकाळी आठपासून मतमोजणीने होणार सुरुवात 👉 ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रानिहाय प्रत्येकी 14 टेबल . *अशा राहतील मतमोजणी फेऱ्या* उदगीर=मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी फेऱ्यामध्ये सर्वाधिक 28 मतमोजणी फेऱ्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात होतील. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात 27, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 26, निलंगा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 25 आणि उदगीर व लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात प्रत्येकी 24 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. तसेच टपाली मतमोजणीची 1 फेरी होणार आहे. एकूण लोकसभा मतदारसंघाचा विचार करता मतदान यंत्रातील मतमोजणीच्या 28 आणि टपाली मतमोजणीची 1 फेरी झाल्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल. मतदान यंत्रावरील प्रत्येक फेरीला अंदाजे 20 मिनिटे ते 30 मिनिटे लागण्याची शक्यता आहे. मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक फेरीचा उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी याठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या पूर्वेकडील बाजूच्या प्रवेशद्वारातून प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच जनतेसाठी मतमोजणी केंद्राबाहेरील ध्वनिक्षेपकाद्वारे फेरीनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती दिली जाणार आहे. *मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून येण्यास मनाई* मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास मनाई करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल. *मतमोजणी केंद्र परिसरात तगडा बंदोबस्त* मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. केंद्रीय राखील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि लातूर जिल्हा पोलीस आणि गृहरक्षक दलातील जवानांचा यामध्ये समावेश राहणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या नेतृत्वात 6 पोलीस उपाधीक्षक, 13 पोलीस निरीक्षक, 48 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 460 पोलीस जवान, दंगा विरोधी दलाच्या 3 तुकड्या, शीघ्र कृती दलाची 1 तुकडी, गृहरक्षक दलाचे 300 जवान यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. *मतमोजणी केंदाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू* लातूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून, 2024 रोजी शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन, बार्शी रोड, लातूर येथे सकाळी 8 पासून सुरु होणार आहे. या मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 4 जून 2024 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image