विदर्भ चेंबरच्या कार्यकारिणीची अविरोध निवड 👉 सलग दुसऱ्यांदा निकेश गुप्ता अध्यक्षपदी बिनविरोध उदगीर:-शतकोत्तर वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ची सन 2024-26 साठी 31 सदस्य असणाऱ्या कार्यकारणीची अविरोध निवड करण्यात आली. यात वर्तमान अध्यक्ष निकेश गुप्ता यांचीअविरोध फेरनिवड करण्यात आली. चेंबरच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा बहुमान निकेश गुप्ता यांना मिळाला. यापूर्वी हा मान चेंबरचे माजी अध्यक्ष अशोक गुप्ता, अशोक दालमिया, बसंत बाछूका ना मिळाला होता.खंडेलवाल भवनात नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक आमसभेत मान्यवरांच्या उपस्थितीत चेंबरच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.या नूतन कार्यकारणीत अध्यक्ष निकेश गुप्ता, वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटीया,कनिष्ठ उपाध्यक्ष निखिल अग्रवाल, सचिव निरव वोरा, सहसचिव किरीट मंत्री, कोषाध्यक्ष किशोर बाछुका कामकाज बघणार आहेत.तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून आशिष चंदाराणा, एड. सुभाषसिह ठाकूर, सलीमभाई डोडिया, चंचल भाटी, मनीष केडिया, राजकुमार राजपाल, योगेश अग्रवाल, कृष्णा शर्मा, निलेश अग्रवाल, आशिष अमीन, महेश मुंदडा, राजीव शर्मा, सज्जन अग्रवाल,संतोष छाजेड,राहुल मित्तल, शैलेंद्र कागलीवाल, राहुल गोयनका,आशुतोष वर्मा, सौ दिपाली देशपांडे, गुलशन कृपलानी, हरीश लाखानी, शांतीलाल भाला, सौ रजनी महल्ले,दिलीप खत्री, कमल खंडेलवाल आदींची निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून निरंजन अग्रवाल, रमाकांत खंडेलवाल, सीए प्रवीण बाहेती यांनी कामकाज बघितले. आपल्या अविरोध निवडीवर नूतन अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी चेंबरच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानलेत.व्यापार व उद्योजकांच्या अडीअडचणी शासनास अवगत करून समस्या सोडवण्यासाठी आपण पाठपुरावा करू तसेच या कार्यकाळात वोकल फार लोकल, यशस्वी उद्योगासोबत चहा चर्चा, युवा उद्योजकासाठी औद्योगिक भेट व व्यापारी व उद्योजकाची अध्यावत डायरेक्टरी प्रकाशित करने आदी रचनात्मक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी गुप्ता यांचे मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना शुभेच्छा बहाल केल्यात. नूतन कार्यकारणीचे व्यापार,उद्योग जगतासह सोनी परिवार उदगीर ने अभिनंदन केले आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image