राजस्थान मल्टिस्टेटच्या लातुरातील अकरा सल्लागारांचा जामीन फेटाळला 👉सर्व धन दांडगे,गांधी चौक पोलीस अटक करणार का? उदगीर: ठेवीवर अवाढव्य व्याज देऊन अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी झालेल्या परळी येथे मुख्य शाखा असलेल्या राजस्थान मल्टिस्टेट पतसंस्थेतील पदाधिकाऱ्यांनी ३०० कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. यामुळे ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. लातूर जिल्ह्यातीलही शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याने लातूर येथील ११ सल्लागार संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्या संचालकांमध्ये लातुरातील नामवंतांचा समावेश आहे. मागील दोन वर्षांपूर्वी परळी येथील चंदूलाल बियाणी यांनी राजस्थान मल्टिस्टेट पतसंस्थेची सुरुवात केली. पतसंस्थेचे नाव होण्यासाठी सुरुवातीच्या काळात या पतसंस्थेने ठेवीदारांना ठेवींवर ११ ते १२ टक्के व्याज देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. अल्पावधीतच या पतसंस्थेच्या महाराष्ट्रासह परराज्यातही ४१ शाखा सुरू करण्यात आल्या. या पतसंस्थेच्या व्याजामुळे अनेक सेवानिवृत्तांनी निवृत्तीनंतर आलेले सर्व पैसे याच पतसंस्थेकडे गुंतविले. परंतु, परळीच्या मुख्य शाखेलाच पोलिसांनी सील केले आहे. यामुळे हजारो गुंतवणूकदारांची पाचावर धारण बसली आहे. पतसंस्थेच्या शाखांमध्ये जाऊनही गुंतवणूकदारांच्या रकमा मिळत नसल्याने नरेंद्र अगरवाल यांनी लातूरचे सल्लागार संचालक असलेल्या अकरा जणांविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सल्लागार सत्यनारायण पन्नालालजी लड्डा, गोकुळदास मदनलाल चांडक, बालकिशन पांडुरंग मुंदडा, गंगाधर जवाहरलाल धूत, गोविंद गोपालदास कोठारी, कमलाकर राजाराम कुलकर्णी, बालाप्रसाद बन्सीलाल बिदादा, पांडुरंग मथुरालाल कचोलिया, गोविंदलाल लक्ष्मीनारायण पारीख, ओमप्रकाश कन्हैय्यालाल मुंदडा आणि सत्यनारायण बन्सीलाल हेड्डा या अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी लातूर येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, असे येथील जिल्हा न्यायालयाचे सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी सांगितले.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image