उदगीर चे तसिल कार्यालय बनले दलालाचा अड्डा ? 👉 कोणतेही कागद काढायचे असेल तर दलाला मार्फत गेले तरच मिळते कागद ,राशन कार्ड बनवायचे 2000रू,उत्पन्न दाखला काढायचा 1000 रू, निराधार 4000 रू 👉 कोतवाल, तसिल चे कर्मचारीच झाले दलाल उदगीर= उदगीर चे तसील कार्यालयात मागील काही दिवसांपासून अंधेर नगरी चौपट राज चालु असल्याचे दिसत असून, तसील कार्यालयातून कोणास काही कागद पत्र काढायचे असतील तर दलाला शिवाय हे कागद पत्र निघणे अवघड झाले आहे याची प्रचिती येथे येणाऱ्या सर्वाँना होत असून ही अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणी प्रमाणे गपचुप दलाला मार्फत कागद पत्र काढून घेत आहेत, जसे की शाळा कॉलेजे सुरू झाले की पाल्यांना उत्पन्न दाखला लागतो, आता प्रशासनाने लाडकी बहिण योजना चालु केली त्यासाठी राशन कार्ड लागते ,कोणास नॉन क्रिमीलियर तर काहींना कोणत्यातरी योजनेत नाव घालायचे असते हे हेरून येथील कर्मचारीच दलाल होऊन रेशनकार्ड साठी 2000रू,उत्पन्न दाखला 1000रू, निराधार योजनेत नाव घालण्यासाठी 4000 रू ते 6000 रू खुले आम् घेत असून हे घेणे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृपे शिवाय होत नाही हे लोक बोलत आहेत,जर दलाला मार्फत गेले नाही तर वेबसाईट चे कारण सांगून जे कागद दलाल 10 मिनिटात काढून देतो त्यास 15 दिवस फिरवले जाते मग कंटाळून दलाला शिवाय पर्याय नसल्याने दलाल धारावाच लागतो तसिल कार्यालयातील कोतवाल,कर्मचारीच दलाली करत असल्याची तोंडी तक्रार अनेकांनी तहसीलदार यांच्याकडे केल्याचे समजते पण त्या कोतवालावर,कर्मचाऱ्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने शेवटी कंटाळून दलालाची पैसे मागत असल्याची ध्वनी फित समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आली असून ज्या कोतवालानी,कर्मचाऱ्यांनी खुले आम् पैसे मागितले आहेत त्यांच्यावर वरिष्ठ काही कार्यवाही करून त्यांना निलंबित करतात का याना पाठीशी घालतात हे पाहावे लागेल
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image