मा.आमदार सुधाकर भालेरावानी तुतारी फुंकली 👉 भालेरावाचा शरद पवार गटात प्रवेश उदगीर : राज्यात भाजपला मोठा धक्का बसला असून उदगीर भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला असून या प्रवेशामुळे अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे याना आगामी विधानसभा निवडणुकीत तगडे आव्हान झेलावे लागेल असे दिसते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सुधाकर भालेराव यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला मुंबई येथील यशवंराव चव्हाण सभागृहात पार पडला. राज्यातील विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने सुधाकर भालेराव यांना डावलले आणि परभणी येथील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजयी झाले. संजय बनसोडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असून सध्या ते क्रीडामंत्री आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची अजित पवार यांच्या राष्ट्रावादीसोबत युती असल्यामुळे संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. त्यामुळे भाजपकडून आगामी विधानसभेसाठी आपल्याला संधी मिळणार नाही, हे निश्चित झाल्यानंतर सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. महाविकास आघाडीत उदगीरची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीरमध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे व शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून भालेराव यांच्या शरद पवार गटात प्रवेशाने कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे याना आगामी विधानसभा निवडणुक सोपी नसल्याचे बोलले जात आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image