*आगामी काळात ऊर्जा निर्मितीची साधणे बदलतील - डॉ. राम आंब्रे (शास्त्रज्ञ - University Of Denver, Denver, Colorado, USA)* उदगीर: उदयगिरी अकॅडमी येथे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे याचे मार्गदर्शन मिळावे यासाठीच्या आयोजित कार्यक्रमास डॉ.राम आंब्रे, सॉफ्टवेअर इंजिनियर सौ. प्रगती राम आंब्रे आणि नुकताच JEE परीक्षेत 97.38% मिळवून RGIPT, Amethi या कॉलेजला Engineering साठी प्रवेशास पात्र ठरलेला उदयगिरी अकॅडमीचा माजी विद्यार्थी ओम शेरीकर हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना येणार्‍या काळात ऊर्जा निर्मितीची साधणे बदलतील यावर जगभरातील शास्त्रज्ञ काम करत आहेत, पेट्रोल डिझेलची आवश्यकता कमी होऊन पर्यायी स्त्रोत निर्माण होतील. जसे पाण्याचे पृथक्करण करून हायड्रोजन वेगळे करून हायड्रोजन वायू इंधन म्हणून वापरणे. सौर ऊर्जा यंत्रांची गुणवत्ता वाढवणे व किंमत कमी करणे अश्या संशोधनांच्या प्रयत्नांना यश निश्चित मिळेल असे वक्तव्य सध्या अमेरिकेतील Denver University येथे रसायनशास्त्रज्ञ म्हणुन कार्यरत असलेले उदगीरचे सुपुत्र डॉ. राम आंब्रे म्हणाले. संशोधन क्षेत्रात देशात तसेच परदेशात विद्यार्थ्यांना प्रचंड वाव असल्याचेही त्यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांनी स्वतः चा सर्वांगीण विकास घडवून आणावा तसेच मोठी स्वप्ने पाहून ती सत्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी असे सौ. प्रगती आंब्रे म्हणाल्या. ओम शेरीकरने देखील विद्यार्थ्यांना त्याचा IIT कॉलेज मिळविण्यापर्यंतचा प्रवास सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयगिरी अकॅडमीचे संचालक मार्गदर्शक प्रा. गोपाळकृष्ण घोडके सर होते तर प्रा.डॉ.धनंजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रा.संतोष पाटील यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी प्रा. ज्योती खिंडे, प्रा. श्रीगण वंगवाड, प्रा. मीना हुरदाळे, प्रा. नंदिनी नीटूरे, प्रा. निवेदिता भंडारे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image