बदलापूर, चाकूर आणि कोलकोता येथील गुन्हेगारांवर कार्यवाही साठी महीला काँग्रेस चे धरने उदगीर =आज मुली कुठेच सुरक्षित राहिल्या नाहीत, महिलांची सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे आणि या संदर्भात शासन प्रशासन कुचकामी ठरत आहे लोकांना व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही म्हणत लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे धरणे आंदोलन करण्यात आले बदलापूर येथील घटनेच्या प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्टात चालवण्यात यावे दोषींना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, सरकारने पारीत केलेले शक्ती बिल केंद्राकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे या बिलाचा कायदा केल्यास बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देता येणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करावा तसेच या प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी न घालता कडकं शासन करावे भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत यासाठी यथोचित पाऊले उचलावीत. अश्या मागण्या या धरणे आंदोलनात करण्यात आल्या. या प्रसंगी लातूर जिल्हा महिला कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षा श्रीमती शिलाताई पाटील, तालुका अध्यक्षा सौ सरोजाताई बिरादार, शहर अध्यक्षा सौ झिल्ले ताई, सौ चारुशीला पाटील, सौ ज्योती ताई डोळे, बालिका मुळे, जळकोट तालुका अध्यक्षा मंजुषाताई पांचाळ, बबिता भोसले, रेखाताई कानमंदे, संध्याताई पटवारी, प्राजक्ता ताई शेरे, शिवाजी हुडे, मधुकर एकुरकेकर, श्रीकांत पाटील, मंजुर खान पठाण, पद्माकर उगिले, आशिष पाटील, नाना ढगे, दत्ता सुरनर, अजित शिंदे, अहमद सरवर, ओमकार गांजुरे, मोहन पाटील, प्रमोद पाटील, संतोष बिरादार, श्रीनिवास एकुरकेकर, लक्ष्मणराव सोनवले, बिपीन जाधव, विवेक जाधव, परमेश्वर अडगुळवाड, प्रीतम गोखले, सोनू पिंपरे, कनिष्क शिंदे, सद्दाम बागवान, राजेश्वर भाटे, गोविंद भालेराव, शिवाजी देवनाळे, मुंताजीब खाजा, विकास देशमाने, शंकर मोरे, सतीश पाटील मानकीकर सह कांग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image