राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे दूध डेरी भंगारात - स्वप्निल जाधव उदगीर = कधीकाळी देशपातळीवर नावाजलेली उदगीरची शासकीय दूध योजना, आज राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे भंगारात निघत आहे. ही अत्यंत शोकांतिका आहे. राज्यकर्त्यांनी केवळ प्रत्येक योजनेतून मला काय मिळते? अशी भूमिका न ठेवता किंवा गुत्तेदार आणि दलाल यांना पोसण्यासाठीच काम न करता, जनतेचे हित पाहावे. असे विचार युवानेते स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केले आहे. उदगीर येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, पूर्वी उदगीर, जळकोट, देवणी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेती पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करता यावा. असा मोठा विचार करून स्व. शंकरराव चव्हाण यांनी 1974 - 75 साली उदगीर येथे शेतकऱ्याचे हित डोळ्यासमोर ठेवून शासकीय दूध योजना सुरू केली होती. पुढे त्यात विकास होऊन दूध भुकटी प्रकल्पही सुरू करण्यात आला. दूध डेअरीमुळे डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. 1978 साली दूध भुकटी प्रकल्प सुरू झाला. त्यावेळेस फक्त चार कोटी रुपयांचा हा प्रकल्प शेकडो शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारा ठरत होता. परंतु पुढील कालावधीमध्ये या प्रकल्पाची भरभराट होण्याऐवजी तो मोडकळीत काढण्यात आला. यात केवळ राजकीय महत्त्वकांक्षा आडवी आल्याने या प्रकल्पाची अवस्था बिकट झाली. आणि ही दूध योजना आणि दूध बुकटी प्रकल्प बंद पडला. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या 13 एकरहून अधिक जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला आहे. दूध भुकटी प्रकल्पासाठी गावरान व देशी गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेले पावडर एक नवीन ब्रँड ठरले होते. देशातील अनेक राज्यातून आणि परदेशातही या दूध भुकटी ची मागणी वाढली होती. गुजरात, नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागातून तर ऍडव्हान्स बुकिंग करून दूध पावडरची मागणी केली जात होती. 1990 च्या काळात या शासकीय दूध योजनेला आणि दूध भुकटी प्रकल्पाला सोन्याचे दिवस आले होते. साधारणता एक लाख दहा हजार लिटर दूध संकलन क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल दीड लाखापर्यंत दूध संकलन केले जात होते. दूध भुकटी प्रकल्पातून 11 मॅट्रिक टन पावडर निर्माण केले जात होते. या शासकीय दूध योजना आणि दूध भूकटी प्रकल्पांतर्गत तब्बल 424 कर्मचारी कार्यरत होते. मात्र यानंतर कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही. हळूहळू दूध भुकटी प्रकल्प बंद पडला, की पाडला गेला? या संदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. मात्र बंद पडलेले या प्रकल्पाला पुन्हा चालू करावे असे कोणतेही राजकीय पुढाऱ्याला वाटले नाही. याला अपवाद म्हणून तत्कालीन आमदार स्व. चंद्रशेखर भोसले हे ठरतात. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याकडे अट्टाहास करून, वेळप्रसंगी विधानभवनावर उपोषण करून, आंदोलन करून दूध डेरी पुन्हा सुरू केली होती. मात्र त्यानंतर लगेच काही दिवसातच पुन्हा ही दूध डेरी बंद पडली. परिणामतः या दुध डेअरीमध्ये कार्यरत असलेले 424 कर्मचारी इतर खात्यामध्ये स्थलांतरित करण्यात आले. या दुध डेअरीच्या पुनर्जीवनासाठी सात कोटी रुपयांचा प्रस्ताव 2015 मध्ये पाठवण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावाकडे फारसे गांभीर्याने कोणी पाहिले नाही. त्यामुळे तांत्रिक मंजुरीच्या चक्रव्यूहात हा प्रस्ताव अडकून पडला, आणि आज चक्क भंगार मध्ये या प्रकल्पाची यंत्रसामग्री विक्री केली जात आहे. फक्त उदगीरच नव्हे तर सीमा वर्ती भागात आणि जळकोट, देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनाच्या जोड धंद्यासाठी हा प्रकल्प आधारवड होता. आजच्या घडीला या प्रकल्पाचा बळी गेला आहे. मध्यंतरी काही प्रमाणात या जमिनीवर डोळा ठेवून काही राजकीय पुढार्यांनी ही दूध डेरी खाजगी प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला, मात्र उदगीरच्या दूध डेरी बचाव या नावाने काही युवकांनी समिती स्थापन करून, पाठपुरावा करून केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फारसे यश आले नाही. आणि हे सर्व होण्याचे कारण म्हणजे स्थानिकच्या नेतृत्वाला त्याची काही गरज वाटली नाही की काय? अशी शंका स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केली आहे. 👉👉..... लाखोंचे भंगार पडून, अनेक वस्तू गायब....... 424 कर्मचाऱ्यांचे कुटुंब या प्रकल्पावर चालत होते. हजारो शेतकऱ्यांना जोडधंद्यातून चार पैसे मिळत होते. रोजंदारीवर बरेच कामगार या ठिकाणी काम करत होते. त्या सर्वांच्याच पोटावर पाय पडल्यानंतर या प्रकल्पाचे अक्षरशः भंगारामध्ये रूपांतर झालेले आहे. या प्रकल्पातील अनेक वस्तू गायब झाल्या आहेत. आईस फॅक्टरीचे लोखंडे पाईप, भंगाराचे साहित्य जागेवर दिसून येत नाही. कधीकाळी महाव्यवस्थापक असलेल्या योजनेला आता पूर्ण वेळ एखादा अधिकारी देखील नाही. इतकेच नाही तर जबाबदार अधिकारी नाहीत, तेथील अधिकाऱ्यांना देण्यात आलेला जीप ही तेथेच कुजून जात आहेत. आणि ह्या सर्व दुर्गतीला केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत आहे. जर राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असती तर शेकडो कोटी रस्ते बनवताना खड्ड्यात घालण्यापेक्षा अनेकांचे घरे चालवणारा हा प्रकल्प जिवंत ठेवला गेला असता, मात्र या प्रकल्पाला उभा करून आपला काय फायदा? असा विचार राजकीय नेत्यांनी केला असावा. अशी ही शंका स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केली आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
• श्रीनिवास मदनलाल सोनी

लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn