राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे दूध डेरी भंगारात - स्वप्निल जाधव उदगीर = कधीकाळी देशपातळीवर नावाजलेली उदगीरची शासकीय दूध योजना, आज राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे भंगारात निघत आहे. ही अत्यंत शोकांतिका आहे. राज्यकर्त्यांनी केवळ प्रत्येक योजनेतून मला काय मिळते? अशी भूमिका न ठेवता किंवा गुत्तेदार आणि दलाल यांना पोसण्यासाठीच काम न करता, जनतेचे हित पाहावे. असे विचार युवानेते स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केले आहे. उदगीर येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, पूर्वी उदगीर, जळकोट, देवणी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेती पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करता यावा. असा मोठा विचार करून स्व. शंकरराव चव्हाण यांनी 1974 - 75 साली उदगीर येथे शेतकऱ्याचे हित डोळ्यासमोर ठेवून शासकीय दूध योजना सुरू केली होती. पुढे त्यात विकास होऊन दूध भुकटी प्रकल्पही सुरू करण्यात आला. दूध डेअरीमुळे डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. 1978 साली दूध भुकटी प्रकल्प सुरू झाला. त्यावेळेस फक्त चार कोटी रुपयांचा हा प्रकल्प शेकडो शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारा ठरत होता. परंतु पुढील कालावधीमध्ये या प्रकल्पाची भरभराट होण्याऐवजी तो मोडकळीत काढण्यात आला. यात केवळ राजकीय महत्त्वकांक्षा आडवी आल्याने या प्रकल्पाची अवस्था बिकट झाली. आणि ही दूध योजना आणि दूध बुकटी प्रकल्प बंद पडला. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या 13 एकरहून अधिक जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला आहे. दूध भुकटी प्रकल्पासाठी गावरान व देशी गाय आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेले पावडर एक नवीन ब्रँड ठरले होते. देशातील अनेक राज्यातून आणि परदेशातही या दूध भुकटी ची मागणी वाढली होती. गुजरात, नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागातून तर ऍडव्हान्स बुकिंग करून दूध पावडरची मागणी केली जात होती. 1990 च्या काळात या शासकीय दूध योजनेला आणि दूध भुकटी प्रकल्पाला सोन्याचे दिवस आले होते. साधारणता एक लाख दहा हजार लिटर दूध संकलन क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल दीड लाखापर्यंत दूध संकलन केले जात होते. दूध भुकटी प्रकल्पातून 11 मॅट्रिक टन पावडर निर्माण केले जात होते. या शासकीय दूध योजना आणि दूध भूकटी प्रकल्पांतर्गत तब्बल 424 कर्मचारी कार्यरत होते. मात्र यानंतर कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही. हळूहळू दूध भुकटी प्रकल्प बंद पडला, की पाडला गेला? या संदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. मात्र बंद पडलेले या प्रकल्पाला पुन्हा चालू करावे असे कोणतेही राजकीय पुढाऱ्याला वाटले नाही. याला अपवाद म्हणून तत्कालीन आमदार स्व. चंद्रशेखर भोसले हे ठरतात. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याकडे अट्टाहास करून, वेळप्रसंगी विधानभवनावर उपोषण करून, आंदोलन करून दूध डेरी पुन्हा सुरू केली होती. मात्र त्यानंतर लगेच काही दिवसातच पुन्हा ही दूध डेरी बंद पडली. परिणामतः या दुध डेअरीमध्ये कार्यरत असलेले 424 कर्मचारी इतर खात्यामध्ये स्थलांतरित करण्यात आले. या दुध डेअरीच्या पुनर्जीवनासाठी सात कोटी रुपयांचा प्रस्ताव 2015 मध्ये पाठवण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावाकडे फारसे गांभीर्याने कोणी पाहिले नाही. त्यामुळे तांत्रिक मंजुरीच्या चक्रव्यूहात हा प्रस्ताव अडकून पडला, आणि आज चक्क भंगार मध्ये या प्रकल्पाची यंत्रसामग्री विक्री केली जात आहे. फक्त उदगीरच नव्हे तर सीमा वर्ती भागात आणि जळकोट, देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनाच्या जोड धंद्यासाठी हा प्रकल्प आधारवड होता. आजच्या घडीला या प्रकल्पाचा बळी गेला आहे. मध्यंतरी काही प्रमाणात या जमिनीवर डोळा ठेवून काही राजकीय पुढार्यांनी ही दूध डेरी खाजगी प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला, मात्र उदगीरच्या दूध डेरी बचाव या नावाने काही युवकांनी समिती स्थापन करून, पाठपुरावा करून केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फारसे यश आले नाही. आणि हे सर्व होण्याचे कारण म्हणजे स्थानिकच्या नेतृत्वाला त्याची काही गरज वाटली नाही की काय? अशी शंका स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केली आहे. 👉👉..... लाखोंचे भंगार पडून, अनेक वस्तू गायब....... 424 कर्मचाऱ्यांचे कुटुंब या प्रकल्पावर चालत होते. हजारो शेतकऱ्यांना जोडधंद्यातून चार पैसे मिळत होते. रोजंदारीवर बरेच कामगार या ठिकाणी काम करत होते. त्या सर्वांच्याच पोटावर पाय पडल्यानंतर या प्रकल्पाचे अक्षरशः भंगारामध्ये रूपांतर झालेले आहे. या प्रकल्पातील अनेक वस्तू गायब झाल्या आहेत. आईस फॅक्टरीचे लोखंडे पाईप, भंगाराचे साहित्य जागेवर दिसून येत नाही. कधीकाळी महाव्यवस्थापक असलेल्या योजनेला आता पूर्ण वेळ एखादा अधिकारी देखील नाही. इतकेच नाही तर जबाबदार अधिकारी नाहीत, तेथील अधिकाऱ्यांना देण्यात आलेला जीप ही तेथेच कुजून जात आहेत. आणि ह्या सर्व दुर्गतीला केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत आहे. जर राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असती तर शेकडो कोटी रस्ते बनवताना खड्ड्यात घालण्यापेक्षा अनेकांचे घरे चालवणारा हा प्रकल्प जिवंत ठेवला गेला असता, मात्र या प्रकल्पाला उभा करून आपला काय फायदा? असा विचार राजकीय नेत्यांनी केला असावा. अशी ही शंका स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केली आहे.
Popular posts
शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका सात हजार रुपयाची लाच घेताना अडकली जाळ्यात उदगीर - बोरताळा पाटी, देगलुर रोड, उदगीर येथील शंकर माध्यमिक आश्रम शाळेतील प्रभारी मुख्याधिपीका यांना सात हजार रुपयाची लाच घेताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसाकडुन मिळालेली माहीती आशी की, तक्रारदार यांनी काही खाजगी अडचणीमुळे ईयत्ता ९ वी मध्ये शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यानंतर तक्रारदार याना पुढील नौकरीसाठी व व्यवसायासाठी १० वी व त्यापुढील शिक्षण घेणे गरजेचे असल्याने, ता. ६ ऑगस्ट रोजी शंकर माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका त्रिविणी शेरे यांना भेटले. त्यावेळी मुख्याध्यापिका शेरे त्रिविणी यांनी १० वी वर्गात प्रवेश देण्यासाठी दहा हजार रूपयाची लाचेची मागणी केलेबाबत तक्रारदार यांची लाचलुचपत प्रतिबंधक लेखी तक्रार दिली. यावरुन सापळा रचुन आरोपी श्रीमती त्रिवेनि बबुराव शेरे, (वय ४१) प्रभारी मुख्याधापिका शंकर माध्यमीक अश्रमशाळा बोरताळा पाटी, देगलुर रोड उदगीर यांनी तक्रारदार यांचेकडून सात हजार रुपये लाचेची रक्कम त्यांचे कार्यालयामध्ये पंच साक्षीदारा समक्ष स्वतः स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधीत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपअधिक्षक संतोष बर्गे पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, पोलीस कॉस्टेबल किरण गंभीरे, मंगेश कोंडरे, हवलदार श्री.अलुरे, महिला पोलीस कर्मचारी पठाण यांच्या पथकाने सापळा रचुन कार्यवाही करण्यात आली आहे. या घटने वरून एक लक्षात येते की आता शिक्षण विभाग ही लाच घेण्यात मागे नाही
• श्रीनिवास मदनलाल सोनी
स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, गुत्तेदारांनी वीज ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये - स्वप्निल जाधव उदगीर = सध्या लातूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वीज कायदा 2003 च्या कलम 55 प्रमाणे स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केले आहे. वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत. ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नका, असे स्पष्ट सांगावे असेही विधीज्ञ दर्यापूरकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू होऊ शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची, परिपत्रकाची प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरल्याने विज बिल भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटल्याचे स्वप्निल जाधव यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना स्वप्निल जाधव यांनी मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालाचाही हवाला दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टने वीज ग्राहकांना स्पष्ट केले आहे की स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही. थाई स्वरूपातील मिटर घेत असतील तर त्यांच्यासाठी ते अनिवार्य आहे मात्र नियमित ग्राहकांसाठी ते अनिवार्य नाही. संदर्भात विधिज्ञ शरद जोशी यांच्या म्हणण्यानुसार वीज ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे हे कायद्याने अपराध ठरू शकेल जबरदस्ती करून मीटर जर कोणी बसवत असेल तर तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन कारवाई बद्दल सीहोर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत वर्मा यांनी आभार मानले आहेत, स्मार्ट मीटर बसवणे हे खाजगी कंपनीने कंत्राट घेऊन शासनाच्या काही लोकांना हाताशी धरून हे काम चालू केले आहे. भविष्यात हे मीटर रिचार्ज सिस्टीम चे होणार आहेत. त्यामुळे राज्यात त्याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसवण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्यांना ताबडतोब विरोध करावा. जीनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसवले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडे महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे. भविष्यात आपली लुबडणूक होणार नाही यासाठी जनतेने स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करावा या संदर्भामध्ये काही स्वयंसेवी संस्था स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना तयार करत आहेत तशा पद्धतीचा अर्ज ग्राहकाने महावितरणला देऊन त्याची पोचपावती घ्यावी त्यासाठी सर्वांनी सावध राहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

उदगीर नगर पालिका अधिकाऱ्याचा उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार ? 👉 गेलेले मुख्याधिकारीच चांगले म्हणण्याची नौबत उदगीरकरावर 👉 मुख्याधिकाऱ्यांना भेटणे म्हणजे नशिबच,जेव्हा जावा तेव्हा साहेब बाहेर ,फोन ही घेत नाहीत 👉 आवक जावक विभाग प्रमुख तर स्वतःला राजा महाराजा समजतो? उदगीर:- स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने मागील अनेक वर्षांपासून उदगीर नगर पालिकेवर अधिकारी राज्य असून या अधिकाऱ्यांना शासनाने जनतेचे सेवक म्हणून ठेवले असताना हे अधिकारी उन्मत्त होऊन स्वतःला राजा महाराजा सारखे वागत असल्याचे चित्र सध्या उदगीर नगरपालिकेत पहावयास येत असल्याने सामान्य जनता त्रस्त दिसत आहे,मदमस्त कर्मचाऱ्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्या कडे करावे म्हटले तर मुख्याधिकारी कोठे राहतात हे त्यांनाच माहिती,जेव्हा केंव्हा जावा मुख्याधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, जाणाऱ्यांना गेलेलाच अधिकारी चांगला होता म्हणण्याची वेळ आली असून ,येथील आवक जावक ला जो कर्मचारी ठेवला आहे तो इतका उर्मट बोलतो की तो राजा महाराजा लाही मागे टाकत असून प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन जनतेच्या हितासाठी त्वरित अधिकारी बदलावेत अशी मागणी जनता करत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
*अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन* उदगीर : जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn