उदगीरच्या ॲड.महेश,बाळासाहेब डोईजोडे चा गाणगापूरच्या नदी संगमावर बुडून मृत्यू उदगीर : गाणगापूर येथील नदी संगमात स्नानासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू झाला तर डोईजोडे यांचा मुंबईचा मित्रही पाण्यात बुडाल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. उदगीर येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे राहत असलेले सिने दिग्दर्शक व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. महेश डोईजोडे हे आपल्या मित्रांना सोबत घेवून कुटुंबियांसह मुंबईहून गाणगापूर येथे दर्शनासाठी गेले होते. महेशने त्याचा भाऊ बाळासाहेब डोईजोडे यालापण उदगीरहून कुटुंबियांसह गाणगापूरला येण्यासाठी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब डोईजोडे यांनीही आपले कुटुंब घेवून उदगीरहून गाणगापूरला पोहचले होते. डोईजोडे व पाटील कुटुंबातील सर्व सदस्य बुधवारी एका लॉजवर थांबले होते. गुरुवारी सकाळी अॅड. महेश डोईजोडे (४७) व त्यांचा भाऊ बाळासाहेब डोईजोडे (४९), मुंबईचा मित्र कैलास पाटील हे तिघेजण गाणगापूरच्या भीमा-अमरजा नदी संगमात स्नानासाठी गेले असता अॅड. महेश व बाळासाहेब या दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर कैलास पाटील यांच्या तोंडात व पोटात पाणी गेल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गाणगापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत बाळासाहेब डोईजोडे हे उदगीर येथील शेटकार इस्टेटमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची सेवा करीत होते. गाणगापूर येथे अॅड. महेश व बाळासाहेब यांच्या प्रेताची उत्तरीय तपासणी करून दोघांचेही प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असुन दोघांही भावांवर शुक्रवारी सकाळी उदगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image