इंजि.विश्वजीत गायकवाड यांच्या विजय संकल्प मेळाव्याने अनेकाची उडवली झोप! उदगीर : जळकोट येथील सामाजिक संघटना अविनाश मित्रमंडळाच्या वतीने आयोजित इंजि. विश्वजीत गायकवाड यांच्या विजय संकल्प मेळाव्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .या मेळाव्यातून इंजि.विश्वजीत गायकवाड यांनी आपण उदगीर विधान सभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले . सामान्यांना आवश्यक अशा जनसुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य आपण सेवक म्हणून करीतच राहणार असल्याचे सांगितले . येत्या विधानसभा निवडणुकीत विश्वजीत गायकवाड यांना विजयी करण्याचा संकल्प अविनाश मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला . प्रथम जळकोट मध्ये प्रवेश करताच विश्वजीत गायकवाड यांचा जेसीबी द्वारे फुलांचा हार घालून आकाशातून पुष्पवृष्टी करून केले गेले .यावेळी विश्वजीत दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणाने आकाश दुमदुमले . इंजि विश्वजीत गायकवाड यांचा अविनाश भाऊ मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना विश्वजीत गायकवाड यांनी ग्रामीण भागात सामान्य व्यक्तींना आवश्यक अशा गरजांची पूर्तता झालीच नसल्यामुळे खरा विकास झाला नसल्याचे सांगितले .जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयातील रक्त तपासणी मशिन बंद आहे , त्यामुळे रुग्नाचे रक्त उदगीरला घेऊन जाऊन तपासणी करुन आणावे लागते , एक्सरे मशिन चलविण्यासाठी कर्मचारी नसल्याने लाखो रूपयाची मशिन धुळखात पडली आहे आणि रुग्णांना दुसरीकडे जाऊन एक्सरे काढावा लागत आहे . पुढे बोलताना गायकवाड म्हणाले सध्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेची अत्यत बिकट परिस्थिती आहे.बसण्यासाठी विद्यार्थ्याना सोय नाही,शौचालय काही ठिकाणी उपलब्ध आहेत मात्र ती बंद पडली आहेत.विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत आशा अनेक मूलभूत सेवा उपलब्ध नाहीत.जिल्हा परिषद शाळा मध्ये सर्वसामान्य शेतक-याचे लेकरे शिकतात म्हणून या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा आरोप केला . आपण प्रत्येक गावात दहा रोपाची लागवड करून त्याची जोपासना करनार, जवळपास पंचवीस हजार विद्यार्थ्यांना बॅगा,पेन, पेन्सिल,वही असे शैक्षणिक साहित्य वाटप केल आहे , द्विव्यांगाना सायकल दिली असे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य आपण सेवक म्हणून करत असून यापुढेही करणार असल्याचे इंजि.विश्वजित गायकवाड यांनी सांगितले . यावेळी व्यासपीठावर माजी खासदार सुनिल गायकवाड़ अविनाश वाघमारे,सिद्धार्थ सुर्यवंशी, आदि सह अविनाश भाऊ मित्रमंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंजि विश्वजित गायकवाड यांच्या झांजावत प्रचाराने अनेकांची झोप उडाल्याचे चित्र सद्या मतदार संघात दिसत आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image