*उदगीरात पुन्हा संजय पर्व; उदगीरकरांची विकासाला साथ* 👉*महायुतीचे उमेदवार ना.संजय बनसोडे ९३ हजार २१४ मतांनी विजयी* *👉हा विजय जनतेला समर्पित : ना. संजय बनसोडे* *उदगीर* : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी तब्बल 1 लाख 52 हजार 38 मतदान घेतले तर आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सुधाकर भालेराव यांना 58 हजार 824 मते पडली. ना.संजय बनसोडे यांनी तब्बल 93 हजार 214 मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी 2 लाख 16 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सर्व मतदारांनी ना. संजय बनसोडे यांनी केलेल्या विकास कामांची आणि त्यांच्या जनसंपर्काची पावती देत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात 13 उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच लढत होईल, हे चित्र कायम राहिले होते. या निवडणुकीत अनेकांनी ना.बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन पक्षप्रवेश केला. मागील ५ वर्षात ना.संजय बनसोडे यांनी उदगीर व जळकोट मतदार संघात केलेल्या विकास कामाच्या जोरावरच त्यांनी जनतेला आपणास पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले होते. मतदार संघात सर्वसामान्यांच्या दारापर्यंत विकासाची गंगा ना.बनसोडे यांनी पोहचवल्याने त्यांचा महाविजय झाला आहे. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 👉हा विजय जनतेला समर्पित.. ना संजय बनसोडे ना.संजय बनसोडे यांनी लातूर जिल्ह्यात मोठे मताधिक्य घेतले आहे. ना. संजय बनसोडे हे विकासामुळे व त्यांचा जनसंपर्क असल्यामुळे अग्रणी राहिले. इतक्या मोठ्या विजयानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधताना हा विजय माझ्या विकास कामाचा आणि जनतेचा आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला मी पात्र राहीन आणि भविष्यातही जनतेच्या विकास कामासाठी सदैव तत्पर राहीन. असा विश्वास दाखवला आहे. तसेच हा विजय जनतेला समर्पित केला आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे मला इतके जास्त मताधिक्य मिळाले आहे. मी जनतेचा कायम ऋणी राहणार असुन आपण जनसेवक म्हणूनच मी भविष्यात काम करणार असल्याचे ना.बनसोडे यांनी सांगितले आहे. 👉 ना.संजय बनसोडे यांचा महाविजय झाल्यानंतर त्यांची आय.टी.आय. काॅलेजपासुन शहरातील मुख्य रस्त्याने त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ना.संजय बनसोडे यांनी शहरातील महापुरूषांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर विविध चौकात ना.बनसोडे यांचे कार्यकर्त्यांनी मोठे पुष्पहार घालून व पुष्पवृष्टी करून नामदार संजय बनसोडे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image