उदगीर- जळकोटच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या : सुधाकर भालेराव उदगीर= उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर संग्राम भालेराव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघातील शहरासह ग्रामीण भागामध्ये कॉर्नर बैठका, संवाद दौऱ्यांमधून मतदारसंघ पिंजून काढला आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करताना केलेल्या शाश्वत विकासाच्या आधारावर राज्यातील महायुती सरकारला सत्तेवरून पायउतार करून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. उदगीर तालुक्यातील लोहारा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार सुधाकर संग्राम भालेराव यांनी 2009 ते 2019 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उदगीर जळकोट तालुक्यातील जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग, नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून तब्बल 60 किलोमीटर अंतरावरून उदगीर शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा केला, नगरोत्थान विकास योजनेतून उदगीर शहरातील दर्जेदार रस्त्यांसाठी 77 कोटी रुपये मंजूर करून दिले, मौजे डोंगर कोणाळी साठवण तलावासाठी 21 कोटी रुपये, चोंडी साठवण तलवासाठी 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील रेल्वे गेट मुळे ऑक्सफर्ड वाहतुकीची समस्या तब्बल 15 कोटी रुपयांच्या उडान पुलामुळे मिटली आहे. तसेच बिदर रोडवरील उडान पुलासाठी 24 कोटी रुपयांचा निधी माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात मंजूर करून आणला आहे. परंतु मागील पाच वर्षात उदगीर विधानसभेच्या शाश्वत विकासाचा गाडा थांबला असून तो पुन्हा गतिमान करण्यासाठी महाविकास आघाडीला आशीर्वाद देण्याचे आव्हान सुधाकर भालेराव यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image