उदगीर 25 टेबल वर 26 फेरीत मतमोजणी संपन्न होणार उदगीर:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि. २०.११.२०२४ रोजी उदगीर विधानसभा मतदार संघात ६७.११% मतदान झाले असून मतमोजणी दि. २३.११.२०२४ रोजी शासकीय आय टी आय, देगलूर रोड उदगीर येथे सकाळी ८.०० वाजता सुरू होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांनी कळवले आहे. सदर मतमोजणी साठी एकूण २५ टेबल चे नियोजन करण्यात आले असून असून त्यापैकी १४ टेबल EVM यंत्रातील मतमोजणीकामी, ९ टेबल टपाली मतपत्रिकांसाठी तसेच २ टेबल ETPBS द्वारे मतमोजणीसाठी असतील मतमोजणी साठी प्रत्येक टेबलवर सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक नेमण्यात आले असून एकूण २६ फेरीमध्ये मतमोजणी संपन्न होईल साधारणतः मतमोजणी कामी ३२५ कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय पुरेसा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सदर मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून ओळखपत्र प्राप्त व्यक्तींना, अधिकारी- कर्मचारी यांनाच प्रवेश असेल. सुरक्षाकामी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यन्वीत आहे. प्रत्येक उमेदवारांना जास्तीत जास्त २५ मतमोजणी प्रतिनिधी या कामी नेमता येतील. याशिवाय कोणीही अनाधिकृत व्यक्तींना मतमोजणी कक्षात प्रवेश असणार नाही. मतमोजणी केंद्राबाहेरील वाहतूक व्यवस्थापन पोलिसाकडून करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेश द्वारावरुनच आत मध्ये ओळखपत्र तपासून पोलीस प्रवेश देतील पत्रकारांसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल फोन इलेक्ट्रानिक उपकरण नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याकामी सर्व उमेदवार, उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी, उमेदवारांनी नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी, पत्रकार' यांनी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुशांत शिंदे यांनी कळवले आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image