वंदे भारत सोडा शेतकऱ्याच्या पिकविमा,सोयाबीन भावा बदल थोड बोला :- मा.कृषि उतपन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव हुडे उदगीर:- उदगीर तालुक्यातील शेतकरी रहातात त्यांना त्यांच्या मालाला भाव पाहिजे पिक विमा पाहिजे है सोडून उठ सूट वंदे भारत रेल्वे चालु करतो,मेडिकल कॉलेज चालु करतो हे बोलणं तुम्हाला शोभत नसून आपण मतदार संघात भौतिक विकास काय केलंत हे सांगावे असे मत कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती शिवाजीराव हुडे यानी व्यक्त केले आहे शिवाजीराव हुडे बन शेळकी येथे सुधाकर भालेराव यांच्या विशाल प्रचार सभेत बोलत होते ,ते म्हणाले की उदगीर जळकोट मतदार संघातील 90% च्या वर मतदार हे शेतकरी कष्टकरी आहेत याना भौतिक सुविधा पाहिजेत ,शेतकऱ्याच्या सोयाबीन ला 4000 ,4100 रू भाव आहे ,शेतकऱ्याचा लागवड खर्च ही निघत नाही,अतिवृष्टी झाली शेतकऱ्याला एक रुपया पिक विमा मिळाला नाही हे बोलणे सोडून मी विकास केला, बिल्डींड बांधल्या,वंदे भारत रेल्वे चालु करतो ,मेडिकल कॉलेज चालु करतो असे गाजर दाखवत आहेत,साहेब वंदे भारत रेल्वे ने गरीब सामान्य शेतकरी एक पोते सोयाबीन विकून प्रवास करेल का,तुम्ही अलिबाग ला न्हेतो म्हणालात तर एक वेळेस येईल पण पुढे ,जे शेतकऱ्याच्या हिताचे आहे ते बोलणे सोडून विकास केला विकास केला म्हणत आहात,विकास कोणाचा झाला हे मतदार संघात होत असलेल्या पैश्याच्या पावसावरून मतदार ओळखत आहेत, आता या मतदार संघातील मतदार भुल थापाना बळी पडणार नसून तो सर्व काही ओळखून मतदान करेल असे मत शिवाजीराव हुडे यानी व्यक्त केले
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image