ना.संजय बनसोडे यांच्या शहरातील पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद *उदगीर* : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर व जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचारात आघाडी घेतली आहे. उदगीर शहरातील आडत लाईन व शहरातील मुख्य रस्त्यावरून नामदार संजय बनसोडे यांची प्रचार रॅली निघाली होती. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे फटाके फोडून शाल व पुष्पहार देऊन सत्कार करुन नामदार संजय बनसोडे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या पाच वर्षात उदगीर जळकोट मतदार संघाचा कायापालट करणारे विकासरत्न आमदार म्हणून संजय बनसोडे यांनी सबंध महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या हाकेला धावून जाणारे नामदार संजय बनसोडे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य, वंचित व कष्टकऱ्यांचे नेते असून त्यांच्यावर सर्व स्तरातील नागरिकांनी प्रेम केले असुन जनतेच्या मनातले आमदार म्हणून ते गेल्या पाच वर्षापासून काम करत आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद असतानाही जमिनीवर असणारा नेता म्हणून नामदार संजय बनसोडे यांची ओळख आहे ते काल निघालेल्या रॅलीतून नागरिकांनी दाखवून दिले आहे. ना.संजय बनसोडे यांच्या प्रचारासाठी उदगीर शहरातील आडत मार्केट यार्डातुन पदयात्रा व रॅलीची सुरूवात ढोलताशांच्या गजरात सुरुवात केली. यावेळी ना.संजय बनसोडे यांनी व्यापा-यांच्या भेटी घेवुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी व्यापा-यांनी ना.बनसोडे यांचे जंगी स्वागत केले. यावेळी पदयात्रा आडत मार्केट ते गणेश मंदिर जय जवान चौक ते मधुबन हॉटेल ते हनुमान कट्टा ते आर्य समाज ते चौबारा ते पोलीस स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा, शिवसेना, रिपाई व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image