*आमदार व मंत्री पद हे जनतेची कामे करण्यासाठी असतात ते मिरवायची नसतात : क्रीडामंत्री संजय बनसोडे* 👉*मागील पाच वर्ष आपला जनसेवक म्हणून काम केले* 👉*लिंबोटीचे पाणी आणून उदगीरकरांची तहान भागविली* उदगीर : मागील माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्व जाती धर्माच्या मंडळींना सोबत घेऊन उदगीरचा विकास केला, श्री गुरु हावगीस्वामी मठ, लिंगायत भवन, लिंगायत चौकी मठ, सिद्धरामेश्वर मठ , स्मशान भुमी, अशा अनेक ठिकाणी निधी दिला,श्री रेणुकाचार्य भवन, मराठा भवन अशा विविध भवनाची निर्मिती करून शहराचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. मंत्री पदाची हवा कधी डोक्यात जाऊ दिली नाही आमदार व मंत्री पद हे जनतेची कामे करण्यासाठी असतात ते मिरवायची नसतात मी मागील पाच वर्ष मी जनतेचा जनसेवक म्हणून काम केले आहे पुढील पाच वर्षे ही तसेच काम करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले. उदगीर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ तळवेस व गोपाळ नगर परिसरात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे बोलत होते. पुढे बोलताना ना. बनसोडे म्हणाले की, मी एक नशीबवान लोकप्रतिनिधी आहे. कारण येथील जनतेने माझ्यावर अफाट प्रेम केले आहे. गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रेमाच्या जोरदार उदगीरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. साडेसहा हजार कोटी रुपयांचा विकास निधी आणून या मतदारसंघाला विकासाच्या एका नव्या टप्प्यावर आणले आहे. या केलेल्या कामाच्या जोरावर मला मते मागण्याचा अधिकार असल्यानेच मी आज मते मागण्यासाठी उभा आहे असे सांगून ना. बनसोडे यांनी अनेक वर्षापासून रखडलेली लिंबोटीची पाणी पुरवठा योजना पूर्ण केली त्यामुळे आज उदगीरकराना मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे ते म्हणाले. शाहरतील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे याकरिता भूमिगत गटारे करण्यात येणार आहेत. उदगीर शहराला पाणी टंचाईच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी लिंबोटी धरणातून पाणी आणून या शहरातील जनतेची तहान भागविण्याचे काम मी पाणीपुरवठा खात्याचा राज्यमंत्री असताना केले असल्याचे ना.बनसोडे यांनी संगीतले यावेळी शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image