*उदगीरमधील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण; प्रशासनामार्फत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू* *नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन* *एक किलोमीटर परिसरातील पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट; दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन* उदगीर : उदगीर येथील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूचे निदान झाले आहे. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेचा याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील एक किलोमीटर परिसरातील कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. तसेच आवश्यक उपाययोजना गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेवून शहरातली कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी रामनगर येथील कुक्कुट पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यू विषयक तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या परिसरातील देशी आणि व्यावसायिक पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अंडी, खाद्यपदार्थ आणि पक्ष्यांचे सर्व अवशेषही नष्ट केले जात आहेत. तसेच या परिसराच्या निर्जंतुकीकरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, वन विभाग, नगरपालिका, पोलीस प्रशासन, जलसंपदा, बांधकाम, भूमि अभिलेख आणि परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. *10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित* बर्ड फ्ल्यूचा फैलाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव क्षेत्राभोवती 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या झोनमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या परीसरात निर्जंतुकीकरण करण्यासोबतच परिसरात कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत. *नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पक्ष्यांची असामान्य मरतुक आढळल्यास प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन* बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत अधिकृत माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी. रोग नियंत्रणासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे. आजारी पक्षी दिसल्यास अथवा कुठेही पक्ष्यांची असामान्य मरतुक झालेला पक्षी आढळल्यास तात्काळ 1962 या टोल फ्री क्रमांकावर किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image