माता नर्गीस दत्त विद्यालय देवणी चे घवघवीत यश.... 👉एनएमएमएस परीक्षेत तालुक्यातून प्रथम व द्वितीय येण्याचा बहुमान याच विद्यालयाचा... उदगीर:-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या वतीने डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या NMMS या परीक्षेत माता नर्गिस दत्त विद्यालय, देवणी जि.लातूर या शाळेने अभूतपूर्व यश संपादन केले. या परीक्षेत एकूण 23 पैकी 22 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या परीक्षेत कु.सोनाली भदरशेट्टे, कु.पटणे वैष्णवी,कु.कापडे वैष्णवी,कु.कापडे रचना,कु.हरनाळे आनंदी, कु.गायत्री बिरादार, कु.टोकमपल्ले वेदांत,कु.मोरे आश्विनी, कु.बिरादार नव्या,कु.बिरादार मुक्ता, कु.मासुलदार अरबाज, कु.मुर्के श्रुती, कु.पांचाळ मयुरी, कु.बन गजराज, कु.शेख अजान,कु. इंचुरे स्नेहल, कु.बदनाळे शैलेश,कु.कल्याणकर संस्कार, कु.पाटील स्वाती, कु.करकेली मन्मथ कु.एकदरेअभिषेक कु. गिरी स्वाती, कु.शेख रेहान,या विद्यार्थ्यांनी माता नर्गिस दत्त विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम केल आहे. देवणी तालुक्यातील पालक,ग्रामस्थ व शैक्षणिक स्तरावरून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचा नेहमीच माता नर्गिस दत्त विद्यालय देवणी जि.लातूर ही शाळा प्रयत्न करत असते. या यशाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री गिरी.एस.एन, श्री पटेल.ए.एच, श्री कन्नाडे.एम.एस,श्री चव्हाण.आर. पी,श्री बिरादार एन.आर,श्री चंदनशिवे एन जे,श्री महादा एन.यु.श्रीमती सगर. एस.व्ही,श्री कुलकर्णी. एस.व्ही, व तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती अंजना सन्मुकप्पा,श्रीमती मळभगे.जे.बी, श्री बुद्रे ए एफ,श्रीमती मोदी जे डी,कांबळे एस.पी.यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यामृत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री नागेशजी जिवणे,सचिव श्री.शांतवीरअप्पा कन्नाडे, श्री बुद्रे एफ ए,श्री ईश्वर प्रसाद बाहेती, व तसेच MCVC चे श्री प्रा.आचारे एस व्ही, श्री.प्रा.जिवणे एस.जे, श्री.प्रा.माने के.एन. ई. मान्यवरांनी केले.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image