उदगीरातील 3 सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार 👉एकूण पाच सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार). पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची कारवाई. उदगीर = याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे विवेकानंद चौक, व उदगीर शहरातील तसेच लातूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी तयार करून वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांविरुद्ध एक वर्षा करिता हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारची कारवाई करण्यात आलेल्याचे नावे 1) अक्षय उर्फ आकाश राम तेलंगे, वय 21 वर्ष, राहणार गोपाळ नगर लातूर 2) साहिल महबूब सय्यद, राहणार संजय नगर लातूर. 3) बालाजी रामराव डोंगरे, वय 58 वर्ष, राहणार इंदिरानगर उदगीर. 4) किशोर कोंडीबा धनवाले, वय 40 वर्ष, राहणार गणेश नगर उदगीर. 5) कृष्णा प्रल्हाद गाडेकर, वय 30 वर्ष, राहणार सोमनाथपूर उदगीर. असे असून नमूद आरोपींतावर पोलीस ठाणे विवेकानंद चौक, उदगीर शहर व लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये समाजविघातक कारवाया करणे, परिसरातील रहिवासी लोकांच्या मालमत्तेला इजा पोहोचून भय निर्माण करणे, प्राणघातक शस्त्र वापरून दहशत निर्माण करणे, आजन्म कारावास किंवा अन्य करावासाचे शिक्षेस पात्र असलेले गुन्हे करणे, शांतता भंग करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती. लातूर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी. नमूद सराईत गुन्हेगारांकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये, याकरिता लातूर शहरात वारंवार मालमत्ता विषयी व शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून सामाजिक शांतता करणाऱ्या गुन्हेगाराना 01 वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले असून नमूद गुन्हेगारांना लातूर जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर सोडण्यात येत आहे. नमूद आरोपी विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी, (लातूर शहर) रणजीत सावंत, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी (उदगीर) सोहेल शेख, पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस ठाणे उदगीर शहर चे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस अमलदार प्रदीप स्वामी, पोलीस ठाणे विवेकानंद चौक व उदगीर शहर चे पोलीस अंमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर, गणेश यादव, रणवीर देशमुख, यशपाल कांबळे, बबन टारपे , गजानन पुल्लेवाड, दीपक कच्छवे, संदीप साठे, रवी शेळके यांनी सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे पाठविले होते. त्यावर पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्तावांचे अवलोकन करून नमूद आरोपीमुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून सदर सराईत गुन्हेगारांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात केले आहे. गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसवण्यासाठी या आधी अनेक गुन्हेगाराना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच आणखीन सराईत गुन्हेगारांचे तडीपाराचे प्रस्तावावर कार्यवाही सुरू असून पुढील काही दिवसातच आणखीन सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात येणार आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image