उदगीर विधिज्ञ संघाच्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचा दणदणीत विजय... अध्यक्षपदी आनंद मुंढे तर उपाध्यक्षपदी गितानंद अक्कनगीरे उदगीर : उदगीर तालुका विधिज्ञ वकील संघाच्या पदाधिकारी निवड २०२५ - २६ साठी २८ मार्च रोजी झालेल्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचा दनदतीत विजय झाला आसून तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष आणि ग्रंथालय सचिव या पदावर उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत तर विधिज्ञ विकास पॅनला सचिव पदावर आपला शिक्कामोर्तब करता आला तर सहसचिव पदावर अपक्ष उमेदवाराने विजय खेचून आणला. चुरशीच्या झालेल्या या अटीतटीच्या निवडणूकीत सर्वसमावेशक समतावादी पॅनलचे उदगीर विधिज्ञ संघाच्या अध्यक्षपदी ॲड .आनंद पंढरीनाथ मुंढे तर उपाध्यक्षपदी ॲड .गितानंद गोविंदराव अक्कनगिरे हे निवडून आले आहेत. विजयी उमेदवार पुढील पुढील प्रमाणे विजयी उमेदवार ॲड. आनंद पंढरीनाथ मुंढे (अध्यक्ष), ॲड .गितानंद गोविंदराव अक्कनगिरे (उपाध्यक्ष), ॲड . चंद्रशेखर वामनराव भोसले (सचिव), ॲड . शरदचंद्र शेषराव पाटील (सहसचिव), ॲड . विजयकुमार सुभाष पाटील माने (कोषाध्यक्ष), ॲड . अमोल तुकाराम कळसे (ग्रंथालय सचिव) या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला तर तत्पूर्वीच ॲड संतोषीमाता मारुती सुर्यवंशी (महिला उपाध्यक्षपदी), ॲड .अश्लेषा चंद्रकांत बिरादार (महिला सहसचिव), ॲड .वर्षा पंकज कांबळे (महिला प्रतिनिधी) हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड . महेश माशाळकर यांनी काम पाहीले तर सहाय्यक म्हणून ॲड . संदीप भांगे यांनी सहकार्य केले. विजयी उमेदवारांचा सत्कार जेष्ठ विधिज्ञ ॲड . गुलाब आण्णा पटवारी, ॲड .एस . टी पाटील , ॲड ' भरत. एम . गुंडरे , ॲड . बालाजी पाटील , ॲड . एस . बी पाटील ' ॲड .बाळासाहेब नवटक्के, ॲड . तानाजी केंद्रे , ॲड . सोपनराव धोंड ,ॲड . तोबरे , ॲड . बी एन बोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image