उदगीर मतदार संघात जलजीवन कामाचा बट्ट्याबोळ:- माजी आमदार सुधाकर भालेराव 👉 करोडो रुपये खर्च होऊन ही जनता एक एक थेंब पाण्यासाठी परेश्यान 👉 उदगीर मतदार संघात भ्रष्टाचाराने गाठला कळस :- सुधाकर भालेराव उदगीर :- उदगीर जळकोट तालुक्यात पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील योजना म्हणजे प्रत्येक घरी पाणी पूर्ण करण्यासाठी येथे जलजीवन योजना राबविली गेली पण गुत्तेदारानी ,अधिकाऱ्यांनी ही योजना जुन्या पाईप लाइन ला नवीन दाखवून तर कुठे निकृष्ट काम करून आपले घर भरून घेतले असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार तथा शरद पवार गटाचे नेते माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले उदगीर तालुक्यातील 108 गावात जलजीवन योजना मंजूर झाली त्या पैकी 66 गावात ही योजना पूर्ण झाली असून अनेक गावात या योजनेत भ्रष्टाचार झाला असून काही गावात तर जुनी पाईप लाइन नवीन दाखवून बिल उचलले असून ही योजना म्हणजे गुत्तेदार,अधिकारी यांचे घरभरन्यायासाठी राबवली का हा प्रश्न उपस्थित होत आहे कारण की या योजने वर करोडो रुपये खर्च होऊन ही जनतेला एक एक थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, उदगीर कराना दररोज शुद्ध पाणी मिळावे म्हणून मी माझ्या काळात करोडो रुपये खर्च करून लिंबोटी हून पाणी आणले पण नाकाम अधिकाऱ्यांमुळे आज उदगीरकराना 8,9 दिवसास पाणी मिळत आहे यांनी तिजोरी भरण्यासाठी 1500 रू ची पाणीपट्टी 3000 रु केली आता आम्ही हे सहन करणार नसून लवकरच आम्ही रस्त्यावर उतरून गुत्तेदाराचे ,अधिकाऱ्याचे पितळ उघडे पाडू असे ही ते म्हणाले,या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गट शहरअध्यक्ष अझीम दायमी सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
• श्रीनिवास मदनलाल सोनी
