पंचायत समिती उदगीर येथे राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा . उदगीर=पंचायत समिती उदगीर येथे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पशुधन अधिकारी श्री.भुपेंद्र बोधनकर,हे होते तर प्रमुख पाहूने म्हणून गटविकास अधिकारी श्री. प्रविण सुरडकर, कृषी अधिकारी श्री. बालाजी केदासे,तालूका पशुधन अधिकारी श्री. घोणषीकर हे होते. या प्रसंगी प्रशासनाकडून उल्लेखनीय कार्य केलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला ते ग्रामपंचायत बामणीस सन 2024/25 चा स्मार्ट ग्राम स्पर्धेत उदगीर तालुक्यात प्रथम क्रमांक व माझी वसुंधरा अभियानात विभागात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी संजय गुरमे , व स्मार्ट ग्राम स्पर्धा सन 2023- 24 नळगीर ग्रामपंचायत प्रथम क्रमांक व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विभागात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी बि . के कांबळे, तसेच सन 2022-23 चा स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत अधिकारी श्री. वैजनाथ मोरतळे तर , विशेष कर वसूलीत तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी श्री. शरद जाधव व राष्ट्रीय पशुधन गणना व बर्ड फ्लू च्या साथीचे नियोजन वेळेत केल्याने पशुधन अधिकारी श्री. घोणषीकर या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक विस्तार अधिकारी श्री. अंकुश बिरादार केले तर मार्गदर्शन गटविकास अधिकारी श्री . प्रविण सुरडकर , कृषी अधिकारी श्री बालाजी केदासे व शासनाच्या शंभर कलमी कार्यक्रमावर श्री. बोधनकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बि. के कांबळे यांनी केले तर आभार पंचायत विस्तार अधिकारी श्री. दंडे यानी मानले. यावेळी पंचायत समितीतीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image