लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार श्रीनिवास सोनी यांना जाहीर 👉 मारवाडी समाजासाठी सतत झटणाऱ्या व्यक्तीस हा विशेष पुरस्कार जिल्हा सभे तर्फे देण्यात येते 👉 5 जून 20250 गुरुवारी दयानंद सभागृह लातूर येथे सदरील पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार उदगीर= उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष तथा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना मानाचा समजला जाणारा लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चा महेश गौरव पुरस्कार घोषित झाला असून 5 जून 2025 रोजी हा पुरस्कार लातूर येथे मोठ्या थाटात दिला जाणार असल्याचे जिल्हा सभे चे सचिव फुलचंद काबरा यांनी सांगितले आहे लातूर जिल्हा माहेश्वरी सभे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित महेश गौरव पुरस्कार या वर्षी उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास मदनलाल सोनी यांना घोषित झाला असून हा पुरस्कार मारवाडी समाजासाठी विशेष काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो,श्रीनिवास सोनी यांनी येथील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमी साठी शासनाकडून 10 गुंठे जागा सह स्मशानभूमी विकासासाठी 30 लाख रुपयाचा निधी ही आमदार संजय बनसोडे यांच्या कडून उपलब्ध करून घेतले तसेच मारवाडी समाजातील गरीब कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देणे,समाजासाठी विविध योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणे,अशा अनेक समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना घोषित करण्यात आल्याचे लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे सचिव फुलचंद काबरा यांनी सांगितले आहे,हा पुरस्कार श्रीनिवास सोनी यांना घोषित झाल्या बद्दल लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे अध्यक्ष प्रकाश कासट, सचिव फुलचंद काबरा,उदगीर येथील प्रसिद्ध समाजसेवक महेश भूषण डॉ रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, गोविंदलाल राठी,कैलास बियाणी अशोक बाहेती , जगदीश बागडी, रामविलास नावंदर,विनोदकुमार टवानी, डॉ रामेश्वर बाहेती,उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे सचिव राजगोपाल मणियार,आनंद बजाज, डॉ प्रवीण मुंदडा,राधेश्याम इनानी,द्वारकादास भुतडा,शिरीष नावंदर,राजेश सारडा ,सत्यनारायण सोमाणी, गणेश बजाज,मारवाडी युवा मंच अध्यक्ष गोविंद मुंदडा,लक्ष्मीकांत सोमाणी,पवन मुंदडा सह उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे सचिव सुनील हवा सह सर्व समाज प्रेमी यांनी सोनी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image