राठीज क्लासेस तर्फे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संपन्न उदगीर= येथील संतोष राठी यांचे प्रसिद्ध राठीज क्लासेस तर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव विशाल बहात्तरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन, उदगीर,डॉ. राजकुमार प्रेमसुखं नावंदर प्राचार्य, संत तुकाराम लॉ कॉलेज, उदगीर,प्रा. ऍड. दिप्ती राजकुमार नावंदर, संत तुकाराम लॉ कॉलेज, उदगीर,श्रीनिवास सोनी,वरिष्ठ पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आला,यात खुशी गोविंद ईनाणी - 97.4 %,वैष्णवी गुडाळे 95.4 %, राघव मणियार 94.2 %,पीयूष गुप्ता -93 %,प्रतीक बेंद्रे - 90% ,हर्षद वाडेकर - 89%, ऋतुजा बेडके - 89 %,सौरुद्र नागरगोजे - 89 %,सुयश कल्लूरकर - 89%,जान्हवी बिरादार - 87%,साईनाथ पदमवार - 85.2,सुयश बिरादार - 85.2%,अंकिता स्वामी 85,ऋचा मोदानी - 84%,भार्गव मसगले - 83 %, शरयू कौठाळे - 82 %,नागेश चांडके -82 %,प्रथमेश बेलकोने - 81% ,अनुश्री उद्तेवार - 80 %,सुमेध बोंद्रे - 81%,प्राची वाघमारे - 81%,दिव्या हैबतपुरे - 80%, अथर्व बिरादार - 80.2 %,अथर्व शेटकार- 81%,दीक्षा रणदिवे - 79.80 %,दीक्षा हैबतपुरे - 77%,पिंजारी महबूब - 76.70,प्रणव बेंद्रे - 81.40,श्रेयस माने - 77 या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले या वेळेस पोलिस निरीक्षक बारहत्ते यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाची मान उंचावेल असे काम करावे,प्रशासकीय सेवेत यावे, ॲड डॉ राजकुमार नावंदर यांनी दहावी नंतर पुढे कोणकोणते क्षेत्र आहेत याची माहिती दिली तर पत्रकार श्रीनिवास सोनी यांनी पालकांनी आपल्या मुलाची आवड जाणून त्या क्षेत्रात पाठवावे ,विनाकारण पाल्यावर डॉक्टर, इंजिनियर हो म्हणून दबाव घालू नये असे अनेक क्षेत्र आहेत की ज्यात उज्वल यश कीर्ती मिळते,प्रास्ताविक सौ राठी यांनी केले पालकांनीही राठी क्लासेस चे आभार मानले
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image