साहेबांचा वचक संपला का अधिकाऱ्यांनी ओळखली पोती? 👉 उदगीर तालुक्यातील अधिकारी निर्ढावले,यांच्यावर वचक कोणाचा उदगीर:- तालुक्यातील अनेक कार्यालयात सध्या अंधेरनगरी चालू असून ही या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कोणीच आवाज उठवत नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत असून अनेक जण तर साहेबाचा वचक संपला तर काही जण अधिकाऱ्यांनी साहेबाची पोती ओळखल्याचे बोलताना दिसत आहेत उदगीर तालुक्यातील अनेक कार्यालयात सध्या अंधेर नगरी चौपट राज दिसत असून येथील अधिकारी हे स्वतःस हुकूमशाह सारखे वागताना दिसत आहेत,महसूल विभागाकडे कुठलीही तक्रार करा त्या तक्रारीस कचऱ्याच डब्बा दाखवला जात आहे कारण की या तक्रारीत या विभागाचा कोणी अधिकारी ,कर्मचारी अडकत असल्याने वरिष्ठ त्यास वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे दिसून येते,दुसरीकडे नगरपालिकेत सध्या प्रशासक राज्य चालू असून दोन दोन महिने टेंडर फ्लॅश होऊन ही टेंडर सुटत नाही,पुढे पावसाळा असल्याने कामे होतील कसे हे प्रशासक आणि तेथील अधिकाऱ्यांनाच माहित,शहरात अनेक ठिकाणी भूमिगत ड्रेनेज चे काम चालू असून हे काम किती उत्कृष्ट होत आहे हे जाणून घेण्यासाठी उदगीरकर उत्सुक असून ही त्याची माहिती मिळत नसल्याचे दिसते,शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढत असताना नगरपालिकेचा अतिक्रमण हटाव पथक गायब असल्याचे चित्र दिसत आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भिंतीला तडे गेल्याने त्यांचे काम किती उत्कृष्ट झाले याचे प्रमाणपत्र देणे शिल्लक राहिलेले दिसते,तालुक्यातील नवीन निर्मित रस्त्याची वाट लागल्याचे दिसते,शहरात भर चौकात मटका,गल्लीत दारू शहरात अवैध धंद्यांना ऊत आले असतांनाही पोलिस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे, उदगीर ला आर टी ओ कार्यालय व्हावे अशी उदगीर कराची इच्छा होती ती पूर्ण झाली खरी पण येथील अधिकारी सकाळ संध्याकाळ रिंग रोड,मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडून अवैध वसुली करत असल्याने उदगीर शहरातील व्यापारावर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत, हे सर्व होत असताना साहेब गप्प का बसले आहेत हे जनतेला कळत नाही ,साहेबाची अधिकाऱ्यावरची वचक संपली ? अधिकाऱ्यांनी साहेबाची पोती ओळखली अशी चर्चा नगरपालिकेसमोर जनता करताना दिसत आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image