शाळा, कॉलेज मधून टि. सी.काढण्यासाठी कुठलीही फी देऊ नका = शिक्षण अधिकारी 👉 फी घेतल्यास कठोर कार्यवाही करणार उदगीर= 16जून 2025पासून शाळा सुरू होणार असुन काही पालक आपल्या पाल्यांना इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणार आहेत तर काही पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश पुढील वर्गात घेणार आहेत. ग्रामीण भागात बऱ्याच खेड्यात गावात फक्त इयत्ता चौथी वर्गापर्यंत चे वर्ग असलेली शाळा असते तर काही ठिकाणी फक्त इयत्ता सातवी वर्गापर्यंत, चे वर्ग असलेली शाळा असते. तर काही ठिकाणी फक्त दहावी वर्गापर्यंत चे वर्ग असलेली शाळा असते. या वेळी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, टी. सी. म्हणजेच शाळा सोडण्याचे प्रमाण पत्राची गरज असते. अशा वेळी आपली टी. सी. काढण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस शाळेला, कॉलेज ला, घेण्याचा अधिकार नाही. हा नियम जिल्हा परिषद शाळेसाठी, खाजगी अनुदानित शाळेसाठी,विनाअनुदानित, शाळा मराठी माध्यमासाठी, लागू आहे. असे असताना जर शाळेने, टी. सी. साठी पालकांकडे,विद्यार्थ्याकडे, फिसची मागणी केली असता तक्रार आल्यास त्या शाळेवर, जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे उदगीर येथील गट शिक्षण अधिकारी शेख यांनी सांगितले आहे
Popular posts
इनोव्हा गाडी रस्ता दुभाजकावर आदळून एक ठार तीन जखमी उदगीर - उदगीर-नळेगाव रोडवर भरधाव इनोव्हा गाडीने रस्त्याच्या मधील दुभाजकाला जोराची धडक दिल्याने पलटी होऊन भीषण अपघात झाला. यात एकजण जागेवरच ठार झाला असुन तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उदगीरहुन वलांडीकडे जात असताना उदगीर-नळेगाव रोडवर सीएनजी पेट्रोल पंपासमोर इनोव्हा क्रमांक एमएच 24 एएस 2555 ही गाडी दुभाजकाला धडकुन बाजूच्या कार क्रमांक एमएच 12जेडी 1546 ला धडकली. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात इनोव्हा गाडी चक्काचूर झाली आहे. इनोव्हा गाडीतील चार प्रवाशापैकी सचिन काशीनाथ मांडगुळे (वय-30) जागीच ठार झाला आहे. तर अशिलेश बालाजी सोनकवडे (वय-23), अश्विनकुमार बालाजी सोनकवडे, (वय-24) संकेत प्रभाकर सोनकवडे (वय-19) सर्व राहणार वलांडी, ता. देवणी जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

इंजिनियर नाही यांच्या पेक्षा गुराखी बरे ? 👉 मारवाडी स्मशानभूमी ची लावली वाट? 👉 लोणारे साहेब मुख्याधिकारी साहेबासमोर एक आणि बाहेर आले की एक बोलतात 👉 40 फूट खोल खणतीत लोक अंतिमसंस्काराठी जातील कसे? उदगीर:- येथील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमी साठी अथक प्रयत्नांती फुले नगर येथील 40 फूट खोल खंतीची 10 गुंठे जागा मारवाडी समाज स्मशानभूमी साठी शासनाकडून देण्यात आली तर या स्मशानभूमी विकासासाठी पूर्व कॅबिनेट मंत्री तथा उदगीर चे आमदार संजय बनसोडे यांनी 50 लाखा चा निधी घोषित केला पण तो निधी 30 लाखावर आला,त्याचा जीआर निघाला ,टेंडर झाले पण उदगीर नगरपालिकेच्या अती शहाण्या अभियंत्यांनी स्मशानभूमी विकासाचा असा प्लान बनवला की डोक्याला हात मारून घेण्या पलीकडे काहीच उपयोग नाही असे दिसते कारण की 40फूट खंती मध्ये जाळण्याचे शेड करणार तर 40फूट खोलीत 2.25 मीटर म्हणजे अंदाजे 7, या 7.25 फूट कंपाऊंड करणार असा इष्टीमेट बनवला असून ज्या खणतीत 20 फूट पाणी थांबते तेथे पावसाळ्यात अंत्यसंस्कार कसे होतील ,40फूट खनतीत अंत्यसंस्काराला येणार लोक उतरतील कसे हे अती भारी इंजिनियर यांनाच माहीत, अशा लोकांमुळे उदगीर नगरपालिकेची वाट लागल्याशिवाय राहणार नाही असे दिसते,यांना थोड ही ज्ञान असते तर हे अशा प्रकारचे प्लान केले असते का हा ही प्रश्न उपस्थित होत असून,तीन महिने झाले टेंडर सुटून यांनी शेवटी मागे लागून मागे लागून झाल्यावर प्लान दिला असून , नकटीच्या लग्नात सतरासे विघ्न म्हणण्याची पाळी मारवाडी समाजावर आली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

हर्षदा सामासे चे नीट परीक्षेत उत्तुंग यश 👉कोणत्याही खाजगी क्लासेस न लावता हर्षदा सामाले चे नीट परीक्षेत घवघवीत यश उदगीर= येथील रहिवाशी हर्षदा बबिता अर्जुनराव सामाले वडिलांचे एक छत्र हरवलेले असताना देखील नीट परीक्षेत कोणत्याही खाजगी क्लासेस विना 720 पैकी 618 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल हर्षदाची आई बबिता अर्जुनराव सामाले यांनी मुलगा मुलगी भेद न करता हर्षदाचे वडील अर्जुनराव सामाले यांनी हर्षदा अगदी लहान असताना देवाज्ञा झाली तरी धीर न सोडता बबिता सामाले यांनी आपली मुलगीच आपला मुलगा आहे असे समजून हर्षदाला चांगले शिक्षण व संस्कार देऊन तिला घडवले असून त्याचाच परिपाक म्हणजे आज हर्षदाने आईने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून कोणत्याही खाजगी क्लास विना तब्बल 618 गुण घेऊन आईच्या कष्टाची चीझ केली आहे. या यशाबद्दल हर्षदाचे आजोबा अशोकराव देशमुख, आजी सुमनबाई देशमुख, मामा गजानन देशमुख, राहुल देशमुख, श्रीकांत देशमुख यांनी आनंद व्यक्त करून हर्षदाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

उदगीरात पत्रकार करणार बोंब मारो आंदोलन 👉दोन महिने होऊन ही पत्रकाराच्या निवेदनावर कार्यवाही नाही 👉 पत्रकार भवनाचे काम निकृष्ट करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करून त्यास काळ्या यादीत टाका,नवीन ठेकेदार नेमून त्वरित काम चालू करा 👉 पत्रकार भवन कृती समितीच्या 59 पैकी 40 पत्रकारांनी सह्या करून दिले निवेदन उदगीर= येथील पत्रकार भवन चे काम ठेकेदार निकृष्ट करत असल्याची तक्रार पत्रकारांनी 17/4/2025 रोजी दिल्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास काम त्वरित बंद करावे असे सांगितले असताना ठेकेदाराने मधेच एक्या दिवसी गुपचुप काम चालू केल्याने परत पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अधिकारी यांना कळवताच त्यांनी पाहणी करून काम न करण्याची सक्त सूचना दिली,पत्रकारांनी तक्रार देऊन दोन महिने होत असताना संबंधित ठेकेदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही किंवा त्यास काळ्या यादीत टाकण्यात ही आले नाही किंवा ठेकेदार ही बदलला नसल्याने पत्रकाराच्या निवेदनास अधिकाऱ्यांनी कचऱ्याचा डब्बा दाखवला का? हा प्रश्न पत्रकारांना पडला असून आता पत्रकार आंदोलनाच्या पवित्र्यात असून 17/6/25 पर्यंत नवीन ठेकेदार नियुक्त करून पत्रकार भवन चे काम सुरू न केल्यास 17/6/2025 रोजी पत्रकार उदगीर येथील कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलनासह धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन सर्व विभागास देण्यात आले असून या निवेदनावर पत्रकार भवन कृती समितीच्या 59 पत्रकारांपैकी 40 पत्रकाराच्या सह्या असून,आता सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन काय कार्यवाही करते हे पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

शाळा, कॉलेज मधून टि. सी.काढण्यासाठी कुठलीही फी देऊ नका = शिक्षण अधिकारी 👉 फी घेतल्यास कठोर कार्यवाही करणार उदगीर= 16जून 2025पासून शाळा सुरू होणार असुन काही पालक आपल्या पाल्यांना इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणार आहेत तर काही पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश पुढील वर्गात घेणार आहेत. ग्रामीण भागात बऱ्याच खेड्यात गावात फक्त इयत्ता चौथी वर्गापर्यंत चे वर्ग असलेली शाळा असते तर काही ठिकाणी फक्त इयत्ता सातवी वर्गापर्यंत, चे वर्ग असलेली शाळा असते. तर काही ठिकाणी फक्त दहावी वर्गापर्यंत चे वर्ग असलेली शाळा असते. या वेळी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, टी. सी. म्हणजेच शाळा सोडण्याचे प्रमाण पत्राची गरज असते. अशा वेळी आपली टी. सी. काढण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस शाळेला, कॉलेज ला, घेण्याचा अधिकार नाही. हा नियम जिल्हा परिषद शाळेसाठी, खाजगी अनुदानित शाळेसाठी,विनाअनुदानित, शाळा मराठी माध्यमासाठी, लागू आहे. असे असताना जर शाळेने, टी. सी. साठी पालकांकडे,विद्यार्थ्याकडे, फिसची मागणी केली असता तक्रार आल्यास त्या शाळेवर, जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे उदगीर येथील गट शिक्षण अधिकारी शेख यांनी सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn