उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
Popular posts
अट्रोसिटी च्या गुन्ह्यात एकूण बारा आरोपीना उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन. 👉 कोणाळी येथील आरोपींना ॲड अजिंक्य रेड्डी यांच्याकडून न्याय देण्याचा प्रयत्न उदगीर: फिर्यादी ने दाखल केलेल्या तक्रारींचे अवलोकन केले असता प्रथम दर्शनी गुन्हा केला असे सिद्द होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता, मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. किशोर संत यांनी अट्रोसिटी कायद्याचा उद्देश अन्याया विरोधात होणे अपेक्षित असून सदर कायद्यांतर्गत प्रथम दर्शनी गुन्हा सिद्ध होत नसल्यास अशा प्रकारांना मध्ये उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत याचिका कर्त्यांना संरक्षण देणे न्यायोचित आहे असे निरीक्षण नोंदवले. प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी महेंद्र रमेश काळे राहणार कोनाळी ता देवणी यांनी अशोक बिरादार व इतर ११ यांचे विरुद्ध कलम ३(१) r,s,t,y अट्रोसिटी कायदा, 1989 अंतर्गत जातीवाचक शिवीगाळ केले बाबत, पवित्र पंचशील ध्वज याचा अवमान केला, हौदाची तोडफोड केली. सदर गुन्हयात अशोक बिरादार यांचा ट्रॅकटर आणि अंकुश चामले यांचा जे सी बी वापरला असे आरोप करत पोलीस ठाणे देवणी येथे फिर्याद दिली. आरोपीनी मा. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन केला असता मा. सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सदर नाराजीने त्यांनी मा. उच्च न्यायालयात ॲड.अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन करीत याचिका दाखल केली. फिर्यादी हा राजकीय पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून सदर फिर्यादी मध्ये एकूण १२ आरोपी विरोधात ढोबळ आरोप करून जास्तीत जास्त आरोपीवर ऍट्रॉसिटी कायदा लागू करण्याबाबत फिर्यादी प्रयत्नशील आहे. फिर्यादीचे सूक्ष्म अवलोकन केले असता ऍट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी लागू होत नसल्याचे निदर्शनास येते. सदर बाब पाहता प्रथम दर्शनी आरोपीवर खोटा गुन्हा दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही अश्या आशयाचा युक्तिवाद केला. मा. उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या कार्यपद्धती बाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपी यांना खोट्या गुन्ह्यात गोवल्या जाण्याची दाट शक्यता आहे असे निरीक्षण नोंदवून सर्व आरोपींना अंतरीमअटकपूर्व जमीन दिला. सदर प्रकरणी सात आरोपी यांचे तर्फे ॲड.अजिंक्य रेड्डी यानी बाजू मांडली त्यांना ॲड. हबीब शेखॲड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

पत्रकार भवन कृती समिती निमंत्रक पदी अर्जुन जाधव 👉 कृती समितीच्या 59 पैकी 37 सदस्यांनी केली बिनविरोध निवड उदगीर= येथील पत्रकार भवन दर्जेदार व्हावे या साठी पत्रकारांनी कृती समिती स्थापन केली होती , त्या पत्रकार भवन चे काम निकृष्ट होत असल्याने पत्रकारांनी वेळोवेळी अनेक निवेदन दिली पण निकृष्ट काम करणाऱ्यास प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालत असल्याने आज कृती समितीच्या 59 पत्रकारांपैकी 37 पत्रकारांनी या बाबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृती समिती निमंत्रक म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे उदगीर तालुका पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती प्रमुख अर्जुन दत्तात्रय जाधव यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकारांनी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर बोंब मारो आंदोलन करून उपजिल्हाधिकारी श्री सुशांत शिंदे यांना निवेदन दिले असून उपजिल्हाधिकारी यांनी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर त्वरित कार्यवाही करून पुढील काम त्वरित चालू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या
• श्रीनिवास मदनलाल सोनी

हर्षदा सामासे चे नीट परीक्षेत उत्तुंग यश 👉कोणत्याही खाजगी क्लासेस न लावता हर्षदा सामाले चे नीट परीक्षेत घवघवीत यश उदगीर= येथील रहिवाशी हर्षदा बबिता अर्जुनराव सामाले वडिलांचे एक छत्र हरवलेले असताना देखील नीट परीक्षेत कोणत्याही खाजगी क्लासेस विना 720 पैकी 618 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल हर्षदाची आई बबिता अर्जुनराव सामाले यांनी मुलगा मुलगी भेद न करता हर्षदाचे वडील अर्जुनराव सामाले यांनी हर्षदा अगदी लहान असताना देवाज्ञा झाली तरी धीर न सोडता बबिता सामाले यांनी आपली मुलगीच आपला मुलगा आहे असे समजून हर्षदाला चांगले शिक्षण व संस्कार देऊन तिला घडवले असून त्याचाच परिपाक म्हणजे आज हर्षदाने आईने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून कोणत्याही खाजगी क्लास विना तब्बल 618 गुण घेऊन आईच्या कष्टाची चीझ केली आहे. या यशाबद्दल हर्षदाचे आजोबा अशोकराव देशमुख, आजी सुमनबाई देशमुख, मामा गजानन देशमुख, राहुल देशमुख, श्रीकांत देशमुख यांनी आनंद व्यक्त करून हर्षदाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

इंजिनियर नाही यांच्या पेक्षा गुराखी बरे ? 👉 मारवाडी स्मशानभूमी ची लावली वाट? 👉 लोणारे साहेब मुख्याधिकारी साहेबासमोर एक आणि बाहेर आले की एक बोलतात 👉 40 फूट खोल खणतीत लोक अंतिमसंस्काराठी जातील कसे? उदगीर:- येथील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमी साठी अथक प्रयत्नांती फुले नगर येथील 40 फूट खोल खंतीची 10 गुंठे जागा मारवाडी समाज स्मशानभूमी साठी शासनाकडून देण्यात आली तर या स्मशानभूमी विकासासाठी पूर्व कॅबिनेट मंत्री तथा उदगीर चे आमदार संजय बनसोडे यांनी 50 लाखा चा निधी घोषित केला पण तो निधी 30 लाखावर आला,त्याचा जीआर निघाला ,टेंडर झाले पण उदगीर नगरपालिकेच्या अती शहाण्या अभियंत्यांनी स्मशानभूमी विकासाचा असा प्लान बनवला की डोक्याला हात मारून घेण्या पलीकडे काहीच उपयोग नाही असे दिसते कारण की 40फूट खंती मध्ये जाळण्याचे शेड करणार तर 40फूट खोलीत 2.25 मीटर म्हणजे अंदाजे 7, या 7.25 फूट कंपाऊंड करणार असा इष्टीमेट बनवला असून ज्या खणतीत 20 फूट पाणी थांबते तेथे पावसाळ्यात अंत्यसंस्कार कसे होतील ,40फूट खनतीत अंत्यसंस्काराला येणार लोक उतरतील कसे हे अती भारी इंजिनियर यांनाच माहीत, अशा लोकांमुळे उदगीर नगरपालिकेची वाट लागल्याशिवाय राहणार नाही असे दिसते,यांना थोड ही ज्ञान असते तर हे अशा प्रकारचे प्लान केले असते का हा ही प्रश्न उपस्थित होत असून,तीन महिने झाले टेंडर सुटून यांनी शेवटी मागे लागून मागे लागून झाल्यावर प्लान दिला असून , नकटीच्या लग्नात सतरासे विघ्न म्हणण्याची पाळी मारवाडी समाजावर आली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn