रानमाळच्या जुगार अड्ड्यावर परत पोलिसाची धाड 👉 *तिर्रट जुगार खेळणाऱ्या 37 जणांवर गुन्हा दाखल. 5,19,500/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. 03 पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाची कारवाई* उदगीर= पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी चे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, पोलीस ठाणे उदगीर शहरचे पोनि गाडे, उदगीर ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड, पोउपनि कदम यांच्या नेतृत्वातील संयुक्त पथकाने उदगीर तालुक्यातील देवणी पोलीस ठाणे हद्दीतील मोघा शिवारातील एका बंद जागेवर छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 37 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 5,19,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उदगीर- बिदर रोडवरील मोघा येथे 13/07/2025 रोजी 22.40 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यादरम्यान 37 आरोपी तिर्रट नावाचा जुगार रुपये लावून खेळत व खेळवीत असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे. यामध्ये रोख रक्कम 2,45,000/- रु तसेच मोबाईल किंमत- 2,74,500/- रुपये असे किंमत अंदाजे- 5,19,500/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये आरोपी 1) संजीवकुमारा माधवराव बिरादार वय-45 वर्षे रा. भालकी ता. भालकी जि. बिदर 2) श्रीकांत मनोहर खासेमपुरे वय-32 वर्षे रा.बिदर ता.जि.बिदर 3) पांडुरंग भिमराव धायगुडे, वय-41 वर्षे रा. कासारशिर्सी ता.निलंगा 4) नंदकुमार चंद्रकांत बेल्लाळे, वय-37 वर्ष रा. सुलतानबागवाडी ता. हुमनाबाद जि.बिदर 5) महादेव बाबुराव मसकल्ले, वय-26 वर्षे रा.बिदर ता. जि.बिदर 6) रामेश्वर राजकुमार शेटकार ,वय 29 वर्षे रा. भालको ता. भालकी जि. बिदर 7) मेघराज आशोक पाटील वय-35 वर्षे रा.बेरीबी ता. भालकी जि. बिदर 8) कैलाश रमेश पाटील वय-35 वर्ष रा.भालकी जि. बिदर 9) राजकुमार रामचंद गौड वय-34 वर्षे रा.हल्लाळी ता. भालकी 10) चंद्रकांत जगन्नाथ तळघाटे वय-42 वर्षे रा.संतपुर ता. औराद 11) सल्लाऊदीन अहमदपाशा शेख वय-32 वर्षे रा.संतपुर ता. औराद 12) चंद्रकांत गणपती पाटील वय-32 वर्षे रा.संतपुर ता. औराद जि. बिदर 13) कल्लपा धनराज तळघाटे वय-35 वर्ष रा.संतपुर ता. औराद 14) बंडेप्पा घाळेप्पा कन्नाळे वय-50 वर्षे रा.संतपुर ता.औराद 15) शरणु शिवराज राजापुरे वय-42 वर्ष रा.भालकी ता. भालकी 16) मारोती संगप्पा मळे वय-38 वर्षे रा. वल्लेपुर ता. औराद जि.बिदर 17) अनिल कल्लप्पा दापके वय-45 रा. जुन्नेखेरी ता. औराद जि.बिदर 18) महेश सिद्राम बिरादार वय-32 वर्षे रा. नागराळ ता. भालकी जि.बिदर 19) रविंद्र कल्लप्पा जिर्गे वय-35 वर्षे रा.ऐकलर ता. औराद 20) गणेश मलिकार्जुन अंदुरे वय-34 वर्ष रा.पाटोदा बु. ता.जळकोट 21) शरणप्पा बसप्पा रंजिरे वय-51 वर्ष रा. सुलतानपुर ता. हुमनाबाद जि. बिदर 22) हानमंत विरशेटीअप्पा जानते वय-38 वर्षे रा. सुलतानपुर ता. हुमनाबाद जि.बिदर 23) नरसिम्हा व्यंकया गट्टे वय-67 वर्ष रा. काजीपल्ली विलेज शासकीय शाळेच्या जवळ हैद्राबाद 24) जयपाल व्यंकटराम रेडी वय-42 वर्ष रा. जिलेलगुडा हैद्राबाद, 25) भिम व्यंकटराव बुक्केवाड वय-36 वर्ष रा.सावरगाव ता. देवणी 26) अर्जुन सुभाष बिरादार वय-35 वर्ष रा.सावरगाव ता. देवणी 27) सहदेव श्रीधर बिरादार वय-27 वर्षे रा. सावरगाव ता. देवणी 28) खालेद गफारसाब कुरेशी वय-40 वर्ष रा. उदगीर ता.उदगीर 29) राहुल आशोक कदम वय-35 वर्ष रा. नालंदा नगर उदगीर 30) सत्यनारायण रमेश व्ही. वय 70 वर्ष रा.गटकेसर ता. गटकेसर जि. रंगारेडी, 31) हानमंत अशोक वारे वय 45वर्षे रा मुखेड जि नांदेड, 32) किरण कुमार वय 40 वर्षे रा कत्तापेठ ता जि हैद्रबाद, 33) नयुम मेहबुबसाब शेख, वय 35 वर्षे, रा. बनशेळकीरोड उदगीर, 34) सुरेश चंद्रया एन. वय 48 रा. हैद्राबाद, 35) प्रमोद विदयसागर धुमाळे यांचा समावेश असुन ते या ठिकाणी हजर होते तसेच 36) वजीर महेबुबसाब बंगाली रा. उदगीर हा सदर जुगार क्लब चालवतात. सदर क्लबचे जागेचे मालक 37) शिवाजी अण्णाराव नेमताबादे (पाटील) यांच्याविरुद्ध देवणी पोलीस स्टेशन मध्ये गुरनं 234/2025 कलम 223 व 112 BNS सह कलम 12 (अ) 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंद झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोउपनि व-हाडे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी, उदगीर शहर व उदगीर ग्रामीणच्या पोलिस अधिकारी अमलदारांच्या संयुक्त पथकाने केली आहे.
Popular posts
पीक विम्याच्या नावावर महा इ सेवा केंद्रा कडून शेतकऱ्याची लूट 👉 पीक विमा कंपनी देते सेवा केंद्रास 40 रू,परत शेतकऱ्यांकडून ही घेत आहेत 100,100 रू. उदगीर= उदगीर तालुक्यातील शेतकरी पाऊस नसल्याने पहिलेच त्रस्त असून आता पीक विमा भरण्यासाठी होणाऱ्या महा इ सेवा केंद्राच्या मनमानी ने शेतकरी वैतागले आहेत,शासनाची पीक विमा योजना म्हणजे महा इ सेवा केंद्राचे घर भरणे का? हा प्रश्न शेतकऱ्यास पडत आहे उदगीर तालुक्यात गत वर्षी 49105 शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून,या वर्षी या पेक्षाही जास्त शेतकरी पीक विमा भरण्यासाठी महा इ सेवा केंद्रावर चकरा मारत आहेत,या वर्षी शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने पहले तर शेतकऱ्यावर आर्थिक ताण पडत असून , हा विमा भरण्यासाठी महा इ सेवा केंद्रास विमा कंपनी प्रति 40 रू.देत असतानाही महा इ सेवा केंद्रावर शेतकऱ्यास लुटण्याचा धंदा सुरू असल्याचे शेतकरी बोलत असून ही हे महा इ सेवा केंद्र वाले शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 100 रू वसूल करत आहेत, 50 हजार शेतकरी शासन देते 40 रू,शेतकऱ्यांकडून 100 धरले तर 70 लाख रुपये उदगीर तालुक्यातून होणारी उलाढाल असल्याने या महा इ सेवा केंद्र वाल्याची मग्रुरी वाढत असल्याचे दिसत आहे
*अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन* उदगीर : जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
Image
उदगिरात लोकशाही चा बोजवारा ,नौकरशाही चा बोलबाला? 👉 नेता गप्प ,गायब विरोधक,सामान्य जनता परेशान उदगीर:-उदगीर तालुका एक ऐतिहासिक ,शैक्षणिक,लोकशाही जपणारा तालुका असताना आता या तालुक्यातून लोकशाही चा अस्त होऊन नोकरशाही चा उदय झाल्याचे चित्र सध्या अनेक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याच्या वर्तनावरून दिसत असल्याचे लोक बोलत आहेत उदगीर तालुक्यात सध्या लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न अनेक मान्यवरराणा पडत असून कुठल्याही शासकीय कार्यालयात जावा तेथील अधिकाऱ्याचे वागणे हे नोकरशाही अवतरली की काय हा प्रश्न उपस्थित होतो,पहले तर अधिकारी भेटत नाहीत,कर्मचाऱ्याचे एकच उत्तर साहेब दौऱ्यावर,दुसरी बाब कुठलीही तक्रार करा यांना माहीत असते की यांच्यात आपला कर्मचारी,अधिकारी अडकणार असल्याने तक्रारदारास साधे दोन ओळीचे उत्तर ही देणे योग्य समजत नाहीत,सध्या अशी परिस्थिती दिसते की अधिकारी,कर्मचारी आपला खिसा कसा गरम होईल हे पाहत आहेत,दुसरीकडे दलालांनी कार्यालयाचा ताबा घेतला की काय हा प्रश्न उपस्थित होतो आहे,कारण की दलालाशिवाय काम होणे अश्यक,अनेक कार्यालयातील अधिकारी कार्यालयात कमी घरी जास्त फाईल हाताळत असल्याची चर्चा असून,मागील काळात नेत्याचा दबदबा अधिकाऱ्यावर असायचा,विरोधी पक्ष सक्षम असायचा पण सध्या नेत्याचा दबदबा दिसत नाही तर विरोधी पक्षच शिल्लक नसल्याने अधिकाऱ्याचे फावत असून तालुक्यात लोकशाही चा बोजवारा,नोकरशाही चा बोलबाला चे चित्र दिसत असल्याने जनता मात्र त्रस्त दिसत आहे