रानमाळच्या तिर्रट जुगार अड्यावर परत पोलिसांची धाड; ३७ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल 👉 काही महिन्यापूर्वी ही धाड घालून अनेक जुगाऱ्यांना केले होते अटक 👉गेल्या अनेक दिवसापासून रानमाळ हॉटेल मोघा येथे कायदा धाब्यावर बसवुन मोठ्या प्रमाणावर जुगाराचा आंतर राज्जीय अड्डा सुरू होता. उदगीर, - गेल्या अनेक दिवसापासून रानमाळ हॉटेल मोघा (ता. उदगीर) येथे कायदा धाब्यावर बसवुन मोठ्या प्रमाणावर जुगाराचा आंतरराज्यीय अड्डा सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना मिळाली होती त्यावरुन त्यांनी दिलेल्या आदेशावरून रविवारी रात्री उदगीर ग्रामीण, शहर व देवणी पोलिसांच्या संयुक्त छाप्यात ३७ जणांवर गुन्हे दाखल करून पाच लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हॉटेल रानमाळ येथे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातील जुगारी संघटित होऊन लाखो रुपये उलाढालीचा जुगार अड्डा सुरु होता. याबाबत नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना कल्पना दिली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उदगीर व देवणीच्या पोलीस निरीक्षकांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या संयुक्त धाडीत जिल्हाधीकारी लातूर यांनी घालून दिलेल्या परवान्यातील नियम व अटींचे उल्लंघन करुन स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी वेळेची मर्यादा ओलांडुन , नियमांचा भंग करून तिर्रट नावाच जुगार पैशांवर खेळत व खेळवीत असताना आरोपीनी संघटीत गुन्हा करुन मुदेमालांसह मिळुन आल्याने पोलिस हवालदार पंडीत बजरंग गुणाले यांच्या फिर्यादीवरून आरोपी संजीवकुमार माधवराव बिरादार वय 45 वर्षे (रा.भालकी जि बिदर), श्रीकांत मनोहर खासेमपुरे यय-32 वर्षे (रा. जि. बिदर), पांडुरंग भिमराव धायगुडे वय-41 वर्षे (रा.कासारशिर्सी ता.निलंगा), नंदकुमार चंद्रकांत बेलाळे वय-37 वर्ष (रा. सुलतान बागवाडी ता. हुमनाबाद जि.बिदर), महादेव बाबुराव भसकले वय-26 वर्षे (रा. ता. जि. बिदर), रामेश्वर राजकुमार शटकार वय 20 वर्षे (रा. ता. भालका जि.बिदर) मेघराज आशोक पाटील वय-35 वर्ष (रा.बेरीबी ता.भालकी जि.बिदर), कैलाश रमेश पाटील यय-35 वर्ष (रा. भालकी जि. बिदर), राजकुमार रामचंद गौड वय-34 वर्षे (रा.हल्लाळी ता. भालकी), चंद्रकांत जगन्नाथ तळचाटे वय 42 वर्षे (रा.संतपुर ता.औराद) सन्बाऊदीन अहनदपाशा शेख वय-32 वर्षे (रा. संतपुर ता. औराद), चंद्रकांत गणपती पाटील वय 32 (रा. संतपुर ता. औराद जि.बिदर), कल्लपा धनराज तळघाटे वय 35 वर्ष (रा.संतपुर ता. औराद), बंडेप्पा घाळेप्पा कन्नाळे वय 50 वर्षे (रा.संतपुर ता.औराद), भन्यु शिवराज राजापुरे वय-42 वर्ष (रा. ता. भालकी) मारोती संगप्पा नळे वय-38 वर्षे (रा. वल्लेपुर ता.औराद जि. बिदर) अनिल कल्लप्पा दापके वय-45 (रा. जुन्नेखेरी ता. औराद जि. बिदर), महेश सिद्राम बिरादार वय-32 वर्षे (रा. नागराळ ता भालकी जि. बिदर), रविंद्र कल्लप्पा जिर्गे वय 35 वर्षे (रा. ऐकलर ता. औराद), गणेश मलिकार्जुन अंदुरे वय 34 वर्ष (रा. पाटोदा बु.ता. जळकोट), शरणप्पा बसप्पा रंजिरे वय-51 वर्ष (रा.सुलतानपुर ता. हुमनाबाद जि. बीदर), हानमंत विरशेटीअप्पा जानते वय-38 वर्षे (रा. सुलतानपुर ता. हुमनाबाद जि.बिदर) नरसिम्हा व्यंकया नहे वय-67 वर्ष (रा. काजीपल्ली हैद्राबाद), जयपाल व्यंकटराम रेडी वय-42 वर्ष (रा. जिलेलगुडा हैद्राबाद), भिम व्यंकटराव बुक्केबाड वय-36 वर्ष (रा. सावरगाव ता. देवणी), अर्जुन सुभाष विरादार वथ-35 वर्ष (रा. सावरगाव ता.देवणी), सहदेव श्रीधर बिरादार वय-27 वर्षे (रा.सावरगाव ता देवणी), खालेद गफारसाब कुरेशी वय-40 वर्ष (रा. उदगीर ता. उदगीर), राहुल आशोक कदम वय-35 वर्ष (रा.नालंदा नगर उदगीर), सत्यनारायण स्पेश व्ही. वयं 70 वर्ष (रा. गटकेसर ता. गटकेसर जि. रंगारेडी), हानमंत अशोक वारे वय 45 (रा मुखेड जि नांदेड), इ किरण कुमार वथ 40 वर्षे (रा कत्तापेठ जि हैद्रबाद), नयुन मेहबुबसाब शेख (वय-35 वर्षे (रा. बनशेळकीरोड उदगीर), चंद्रया एन वय 48 (रा. हैद्राबाद), प्रमोद विदयसागर धुमाळे, वजीर महेबुबसाब बंगाली (रा उदगीर), शिवाजी अण्णाराव नेमताबादे यांच्यावर मुंबई जुगार अधिनियमानुसार देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी रोख रक्कम 2 लाख 45,000, मोबाईल किंमत 2 लाख 74,500 रुपये असे किंमत अंदाजे 5 लाख 19,500 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
Popular posts
उदगीर नगर पालिका अधिकाऱ्याचा उंटावर बसून शेळ्या राखण्याचा प्रकार ? 👉 गेलेले मुख्याधिकारीच चांगले म्हणण्याची नौबत उदगीरकरावर 👉 मुख्याधिकाऱ्यांना भेटणे म्हणजे नशिबच,जेव्हा जावा तेव्हा साहेब बाहेर ,फोन ही घेत नाहीत 👉 आवक जावक विभाग प्रमुख तर स्वतःला राजा महाराजा समजतो? उदगीर:- स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने मागील अनेक वर्षांपासून उदगीर नगर पालिकेवर अधिकारी राज्य असून या अधिकाऱ्यांना शासनाने जनतेचे सेवक म्हणून ठेवले असताना हे अधिकारी उन्मत्त होऊन स्वतःला राजा महाराजा सारखे वागत असल्याचे चित्र सध्या उदगीर नगरपालिकेत पहावयास येत असल्याने सामान्य जनता त्रस्त दिसत आहे,मदमस्त कर्मचाऱ्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्या कडे करावे म्हटले तर मुख्याधिकारी कोठे राहतात हे त्यांनाच माहिती,जेव्हा केंव्हा जावा मुख्याधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, जाणाऱ्यांना गेलेलाच अधिकारी चांगला होता म्हणण्याची वेळ आली असून ,येथील आवक जावक ला जो कर्मचारी ठेवला आहे तो इतका उर्मट बोलतो की तो राजा महाराजा लाही मागे टाकत असून प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन जनतेच्या हितासाठी त्वरित अधिकारी बदलावेत अशी मागणी जनता करत आहे
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या . हंचनाळ ता. देवणी बिनविरोध ! 👉संचालक मंडळ सन 2025 ते 2030 पर्यंतच्या कालावधी साठी असेल उदगीर:- हंचनाळ ता. देवणी जिल्हा लातूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 12 संचालकांची बिनविरोध निवड झाली असून या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे नूतन संचालक म्हणून सोनी श्रीनिवास मदनलाल, बिरादार संतोष बाबूराव, बिरादार शितल शिवाजीराव, बिरादार राजकुमार केशवराव, बिरादार पांडुरंग मारोतीराव ,बिरादार बालाजी माधवराव,कोनाळे शिवाजी वामनराव,पाटील लक्ष्मण धोंडीबा महिला संचालक म्हणून बिरादार राजाबाई तानाजीराव,बिरादार सुरेखा निळकंठराव,अनुसूचित जाती,जमाती महिला संचालक सुर्यवंशी जानकाबाई सुधाकर तर भटक्या विमुक्त जाती,जमाती महिला संचालक म्हणून सोनाळे मनिषा बाबुराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे,ही निवड निवडणुक निर्णय अधिकारी व्हि. डी. कदिरे यांनी यादी प्रसिद्ध करून आज 5/8/2025 रोजी केली आहे ,सर्व नूतन संचालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे, बिनविरोध निवडीसाठी गोपाळराव बिरादार, मधुकर बिरादार, कालिदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले
Image
*अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन* उदगीर : जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे
उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे:- श्री बस्वराज पाटील नागराळकर अध्यक्ष महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी उदगीर उदगीर:- उदगीर चा विकास व्यापाऱ्यामुळे असून आज ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्या व्यापाऱ्याच्या सहयोगामुळे असून उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असल्याचे महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर यांनी अडत व्यापारी वेलफेअर असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले अडत वेलफेअर असोसिएशन वतीने आज रोजी अडत मार्केट मध्ये महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता,यात सोसायटी चे नूतन अध्यक्ष श्री बस्वराज पाटील नागराळकर,उपाध्यक्ष प्रकाश तोंडारे,सचिव डॉ रामप्रसाद लखोटिया,सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवाजीराव हुडे,अजय दंडवते,आडेप्पा अंजुरे,शिवराज वल्लापुरे ,भाग्यश्री चाकुरकर,बस्वराज पाटील,नाथराव बंडे ,प्रशांत पेन्सलवार,अरविंद पाटील, दिलीप चौधरी,रमाकांत अंकुलगे,भिमाशंकर मुद्दा,मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद तिरूके,डॉ. श्रीकांत मध्वरे , मन्मथ बिरादार यांचा सत्कार आयोजित केला होता,या वेळेस सत्काराला उत्तर देताना श्री बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले की महाराष्ट्र उदयगिरी एज्युकेशन सोसायटी ही संस्था व्यापाऱ्यांनी,शेतकारयानी आपल्या कस्टाटुन उभी केली असुन,उदगीर च्या विकासात व्यापाऱ्याचे योगदान महत्वाचे असून व्यापाऱ्याच्या योगदानामुळे उदगीर चा विकास झाला ,आमचे ध्येय एकच आदर्श विद्यार्थी घडविणे हेच आमचे स्वप्न आहे असेही ते म्हणाले,आज आम्ही जे आहोत ते व्यापाऱ्यामुळे या वेळेस अडत वेलफेअर असोसिएशन वतीने उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जगदीश बाहेती,रवींद्र कोरे अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार,नागेश आंबेगाव,साईनाथ कोरे,उमाकांत पांढरे,मल्लिकार्जुन काळगापूरे, श्याम बिरादार, मनोहर बिरादार,शिवाजी पेठे, शिवशंकर बिरादार,मधुकर पाटील, पी. पी.पाटील,साईनाथ कल्याणे,प्रमोद पाटील, कमलाकर भंडे, शांतवीर मुळे,मारुती कडेवार,दिलीप पाटील,दिगंबर गोटमुकले, सुरेश लांडगे,गौतम पिंपरे,विश्वनाथ यलवंतगे, भरत दंडीमे,अरविंद जिरगे,गंगाधर बिरादार,लक्ष्मणराव मोमले, राम बिरादार, संकेत बिरादार,कोंडीराम काळोजी,भिमाशंकर गठोडे सह अडत व्यापारी,सर्व गुमस्था,हमाल उपस्थित होते
Image
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 👉- १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा 👉- आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार उदगीर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. एसटी बस सीट आरक्षित करण्यासाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाची सुविधा देण्यात येईल तसेच आठ हजार की.मी. पर्यंत प्रवासाची मर्यादाही काढणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी बस प्रवासाच्या सवलतींच्या मुद्यावर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव, कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत बारसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर आठ हजार किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारांना एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या मागणीबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांना एसटी प्रवासासाठी सद्या ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध नाही. येत्या १५ ऑगस्टपासून ऑनलाइन सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पुढील महिन्यापासून घरबसल्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी सीट आरक्षित करता येईल. या निर्णयांमुळे पत्रकारांना काम करताना अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले.