स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, गुत्तेदारांनी वीज ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये - स्वप्निल जाधव उदगीर = सध्या लातूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वीज कायदा 2003 च्या कलम 55 प्रमाणे स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केले आहे. वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत. ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नका, असे स्पष्ट सांगावे असेही विधीज्ञ दर्यापूरकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू होऊ शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची, परिपत्रकाची प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरल्याने विज बिल भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटल्याचे स्वप्निल जाधव यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना स्वप्निल जाधव यांनी मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालाचाही हवाला दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टने वीज ग्राहकांना स्पष्ट केले आहे की स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही. थाई स्वरूपातील मिटर घेत असतील तर त्यांच्यासाठी ते अनिवार्य आहे मात्र नियमित ग्राहकांसाठी ते अनिवार्य नाही. संदर्भात विधिज्ञ शरद जोशी यांच्या म्हणण्यानुसार वीज ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे हे कायद्याने अपराध ठरू शकेल जबरदस्ती करून मीटर जर कोणी बसवत असेल तर तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन कारवाई बद्दल सीहोर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत वर्मा यांनी आभार मानले आहेत, स्मार्ट मीटर बसवणे हे खाजगी कंपनीने कंत्राट घेऊन शासनाच्या काही लोकांना हाताशी धरून हे काम चालू केले आहे. भविष्यात हे मीटर रिचार्ज सिस्टीम चे होणार आहेत. त्यामुळे राज्यात त्याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसवण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्यांना ताबडतोब विरोध करावा. जीनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसवले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडे महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे. भविष्यात आपली लुबडणूक होणार नाही यासाठी जनतेने स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करावा या संदर्भामध्ये काही स्वयंसेवी संस्था स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना तयार करत आहेत तशा पद्धतीचा अर्ज ग्राहकाने महावितरणला देऊन त्याची पोचपावती घ्यावी त्यासाठी सर्वांनी सावध राहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे.
Popular posts
दत्त मंदिर परिसरातील भव्य सभागृहाची लवकरच उभारणी करणार =मा.मंत्री संजय बनसोडे 👉संताच्या वाणीतून समाजाला ऊर्जा मिळते : *उदगीर* : उदगीर मतदारसंघ हा एक ऐतिहासिक असून या मतदारसंघात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत. राज्यातून विविध भागातून संत या ठिकाणी येऊन त्यांचे अनमोल विचार समाजातील नागरिकांपुढे व्यक्त करत असतात. या सर्व संतांच्या वाणीतून समाजाला नवी ऊर्जा मिळत असुन आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होत असल्याचे मत राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर शहरातील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजीत एकदिवसीय प्रवचन सोहळ्या प्रसंगी भाविकांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी गुंडानाथ महाराज, चक्रीनाथ महाराज, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, माजी नसरसेवक सुधीर भोसले, सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार पारसेवार, भागवत पारसेवार, सुरेश महाजन, बालाजी पोलावार, संजय कलकोटे, साईप्रसाद पारसेवार, सुयोग कोटलवार, विनोद कपाळे, शिवकुमार कांबळे, धिरज कसबे, गणेश गायकवाड, शहाजी पाटील, सावन पस्तापुरे, प्रीती कवतीकवार, डी.एस. बिरादार, सतिश पाटील माणकीकर, आदीनाथ चिकटवार, मल्लिकार्जुन लंजवाडकर, केशव पाटील, सावित्री पारसेवार, गोदावरी महाजन, मनीषा मुक्कवार, स्मिता मुक्कावार, ओम पिंगळे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, आपल्या आमदारकीच्या व मंत्रिपदाच्या कार्यकाळात शक्य होईल तेवढ्या सर्व धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण आपण केले आहे. विविध ठिकाणी सभा मंडप उभारण्यात आले आहेत. भविष्यात उदयगिरी बाबा किल्ला परिसरात विद्युत रोषणाई करण्याचा आपला मानस असुन मागील काळात श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठाला निधी दिला. श्री सिध्दरामेश्वर मठासह श्री रेणुकाचार्य संस्कार भवन उभारले, श्री गुरु हावगीस्वामी लिंगायत भवन उभारले असुन चौकीला मठालाही निधी दिला असल्याचे सांगितले. या येत्या वर्षाभरात या सोसायटीतील श्री दत्त मंदिर परिसरात सभामंडप उभारणार असल्याचे सांगून सर्वांना आ.बनसोडे यांनी श्री दत्त जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री दत्त जयंतीनिमित्त आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती करुन भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी भाविक - भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Image
रामकथाचार्य शशिशेखर महाराज यांच्या रामकथेस उसळला जनसागर उदगीर= येथील सिग्नल नंबर 2,हनुमान नगर येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित शशिशेखर महाराज यांच्या रामकथेची 29 नोव्हेंबर शनिवारी रोजी भव्य सुरुवात झाली असून सदरील रामकथेचे 7 डिसेंबर रविवार रोजी समापन होणार असून ही कथा दररोज दुपारी 2 ते 5 वाजे पर्यंत सुरू आहे,या रामकथेस भक्ताचा जनसागर उसळला असून सर्व परिसर राममय झाल्याचे दिसून येत आहे,सदरील परिसरातील रहिवाश्यांनी या कथे चे आयोजन केले असून याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही आयोजकांनी केले आहे
Image
उदगीर च्या विकासाठी निलोफर शहाजहान शेख प्रहार तर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 👉 प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा = शहाजहान शेख उदगीर= उदगीरच्या विकासाचा मुद्दा घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाने उदगीर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी निलोफर शहाजहान शेख तर नगरसेवक पदासाठी 5 उमेदवार निवडणुकीत उतरवले असून, आ बच्चू कडू यांचे आदर्श समोर ठेवून प्रहार जनशक्ती पक्ष काम करत असून आम्ही उदगीर च्या विकासासाठी निवडणुकीत उतरलो असून जनतेचा पाठिंबा प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठीमागे असून आम्ही त्याच्याच बळावर जोरावर निवडणूक लढवत असून सगळ्यात जास्त मताने आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलोफर शहाजहान शेख सह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी होतील यात शंका नसल्याचे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष शहाजहान शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे बालाजी तेलंग सह उमेदवार तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Image
कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
मी भाजप सोबतच, पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करणार - माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे उदगीर = भारतीय जनता पक्षाकडे आपण उदगीर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र ती उमेदवारी आपल्याला मिळाली नाही. दरम्यान पक्ष पुन्हा विचार करू शकेल, या धोरणाने आपण भारतीय जनता पक्षाच्या नावाने एक आणि अपक्ष एक, अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महायुतीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे आणि लातूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रमुख आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश आप्पा कराड, आ. संभाजी भैय्या निलंगेकर, माजी मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर या सर्वांनी विनंती केल्यावर आपण अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज परत घेत असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नेते राजेश्वर नीटुरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे. आपण भारतीय जनता पक्षाचाच घटक असल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, उदगीर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. या विचाराने पक्ष संघटन बांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. राजेश्वर निटूरे हे उदगीरच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ असल्याने आणि उदगीर नगर परिषदेवर तब्बल सात वेळा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपला कारभार उदगीरकरांना दाखवून दिलेला असल्याने, जर ते अपक्ष उमेदवार राहिले असते तर राजकीय गणिते बिघडू शकले असती, या विचाराने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज परत घेण्याची विनंती केली, आणि ती विनंती त्यांनी मान्य करून उमेदवारी अर्ज परत घेतला आहे. त्याबद्दल महायुतीचे नेते आ. संजय बनसोडे यांनी राजेश्वर निटूरे यांचे ऋण व्यक्त केले असून, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन उदगीरकरांना केले आहे. उदगीर शहरांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यापेक्षा जास्त बहुमत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. स्वाती सचिन हुडे यांना मिळावे. अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार मोठ्या फरकाच्या मताधिक्याने विजयी व्हावेत. यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक सचिन हुडे यांनी देखील भाजपचे नेते राजेश्वर निटूरे यांचे ऋण व्यक्त करून सर्व उमेदवाराना विजयी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपचे माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. राजेश्वर निटुरे यांच्या उमेदवारी परत घेण्याने, तसेच आपण भारतीय जनता पक्षासोबतच आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले असल्याने महायुतीच्या सर्व उमेदवारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
Image