शाळा, कॉलेज मधून टि. सी.काढण्यासाठी कुठलीही फी देऊ नका = शिक्षण अधिकारी 👉 फी घेतल्यास कठोर कार्यवाही करणार उदगीर= 16जून 2025पासून शाळा सुरू होणार असुन काही पालक आपल्या पाल्यांना इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणार आहेत तर काही पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश पुढील वर्गात घेणार आहेत. ग्रामीण भागात बऱ्याच खेड्यात गावात फक्त इयत्ता चौथी वर्गापर्यंत चे वर्ग असलेली शाळा असते तर काही ठिकाणी फक्त इयत्ता सातवी वर्गापर्यंत, चे वर्ग असलेली शाळा असते. तर काही ठिकाणी फक्त दहावी वर्गापर्यंत चे वर्ग असलेली शाळा असते. या वेळी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, टी. सी. म्हणजेच शाळा सोडण्याचे प्रमाण पत्राची गरज असते. अशा वेळी आपली टी. सी. काढण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस शाळेला, कॉलेज ला, घेण्याचा अधिकार नाही. हा नियम जिल्हा परिषद शाळेसाठी, खाजगी अनुदानित शाळेसाठी,विनाअनुदानित, शाळा मराठी माध्यमासाठी, लागू आहे. असे असताना जर शाळेने, टी. सी. साठी पालकांकडे,विद्यार्थ्याकडे, फिसची मागणी केली असता तक्रार आल्यास त्या शाळेवर, जबाबदार व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे उदगीर येथील गट शिक्षण अधिकारी शेख यांनी सांगितले आहे
Popular posts
दत्त मंदिर परिसरातील भव्य सभागृहाची लवकरच उभारणी करणार =मा.मंत्री संजय बनसोडे 👉संताच्या वाणीतून समाजाला ऊर्जा मिळते : *उदगीर* : उदगीर मतदारसंघ हा एक ऐतिहासिक असून या मतदारसंघात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत. राज्यातून विविध भागातून संत या ठिकाणी येऊन त्यांचे अनमोल विचार समाजातील नागरिकांपुढे व्यक्त करत असतात. या सर्व संतांच्या वाणीतून समाजाला नवी ऊर्जा मिळत असुन आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होत असल्याचे मत राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर शहरातील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजीत एकदिवसीय प्रवचन सोहळ्या प्रसंगी भाविकांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी गुंडानाथ महाराज, चक्रीनाथ महाराज, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, माजी नसरसेवक सुधीर भोसले, सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार पारसेवार, भागवत पारसेवार, सुरेश महाजन, बालाजी पोलावार, संजय कलकोटे, साईप्रसाद पारसेवार, सुयोग कोटलवार, विनोद कपाळे, शिवकुमार कांबळे, धिरज कसबे, गणेश गायकवाड, शहाजी पाटील, सावन पस्तापुरे, प्रीती कवतीकवार, डी.एस. बिरादार, सतिश पाटील माणकीकर, आदीनाथ चिकटवार, मल्लिकार्जुन लंजवाडकर, केशव पाटील, सावित्री पारसेवार, गोदावरी महाजन, मनीषा मुक्कवार, स्मिता मुक्कावार, ओम पिंगळे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, आपल्या आमदारकीच्या व मंत्रिपदाच्या कार्यकाळात शक्य होईल तेवढ्या सर्व धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण आपण केले आहे. विविध ठिकाणी सभा मंडप उभारण्यात आले आहेत. भविष्यात उदयगिरी बाबा किल्ला परिसरात विद्युत रोषणाई करण्याचा आपला मानस असुन मागील काळात श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठाला निधी दिला. श्री सिध्दरामेश्वर मठासह श्री रेणुकाचार्य संस्कार भवन उभारले, श्री गुरु हावगीस्वामी लिंगायत भवन उभारले असुन चौकीला मठालाही निधी दिला असल्याचे सांगितले. या येत्या वर्षाभरात या सोसायटीतील श्री दत्त मंदिर परिसरात सभामंडप उभारणार असल्याचे सांगून सर्वांना आ.बनसोडे यांनी श्री दत्त जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री दत्त जयंतीनिमित्त आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती करुन भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी भाविक - भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Image
रामकथाचार्य शशिशेखर महाराज यांच्या रामकथेस उसळला जनसागर उदगीर= येथील सिग्नल नंबर 2,हनुमान नगर येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित शशिशेखर महाराज यांच्या रामकथेची 29 नोव्हेंबर शनिवारी रोजी भव्य सुरुवात झाली असून सदरील रामकथेचे 7 डिसेंबर रविवार रोजी समापन होणार असून ही कथा दररोज दुपारी 2 ते 5 वाजे पर्यंत सुरू आहे,या रामकथेस भक्ताचा जनसागर उसळला असून सर्व परिसर राममय झाल्याचे दिसून येत आहे,सदरील परिसरातील रहिवाश्यांनी या कथे चे आयोजन केले असून याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही आयोजकांनी केले आहे
Image
कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
राष्ट्रीय मराठा पार्टी चा युती ला जाहीर पाठिंबा उदगीर=राष्ट्रीय अध्यक्ष यांनी श्री. अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी राष्ट्रीय मराठा पार्टीचा नगरपरिषद नगरपरिषद निवडणूक 2025 स्थानिक स्वराज्य संस्थां महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व नगर पंचायत निवडणूकीत भाजप व राष्ट्र वादी श्री.अजीत पवार गटाला निवडणून आणुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उदगीर नगर परिषदचा विकास करण्यासाठी उदगीर नगराध्यक्ष भाजपा चे उमेदवार सौ.स्वाती सचिन हुडे व राष्ट्र वादी श्री.अजीत पवार गटाचे उदगीर चे माजी मंञी आमदार मा.आ.संजयजी बनसोडे व भारतीय जनता पार्टी/राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्व नगर परिषद/नगर सेवकास राष्ट्रीय मराठा पार्टीचा जाहीर पाठींबा. 1)बनसोडे मंजुश्री शशिकांत.2) कसबे धिरज पांडुरंग 3)शेख सना जफर 4)सय्यद इम्रान पाशा 5)बोईनवाड व्यंकटराव भिमराव 6)कपाळे गंगाबाई गरुनाथ 7)भालेराव राजकुमार श्रीपती 8)मुदाळे मणकर्णा अनिल 9)शेख फायाजोदिन नसीरुद्दीन 10)उप्परबावडे शिल्पा मल्लिकार्जुन 11)कुरेशी आलिया फिरदौस अबरार पठाण 12)सय्यद रेश्मा खटिया इमरोज 13)मनोज रामदास पुदाले 14)छाया बस्वराज बागबंदे 15) निकीता व्यंकटराव अंबरखाने 16)राजकुमार संग्राम हुडगे 17)सांगवे निवृत्ती संभाजी 20)शेख नुरजहा इस्माईल 21)शेख शाहजहांपुर बेगम रहीम साब 22]पठाण फैजमुहमद गुलाम 23)सुर्यवंशी अमरनाथ हरिकिशन 24)सय्यद खुर्शीदबी हनीफसाब 25)शिंदे शीतल नरसिंग 26)मुदाळे अनिल नागोराव 27)विद्या आनंद बुंदे 28)साईनाथ माधवराव चिमेगावे 29)नागेश रमेश अष्टुरे 30)भारती सुधीर भोसले 31)मीरा बाबुराव येलमेटे 32)दत्ताजी व्यंकटराव पाटील 33)महापुरे भगीरथ समर्थ 34)विजय राजेश्वर निटुरे 35) शेख समिरोद्दिन अलीमुद्दीन 36)मीना चंद्रकांत कोठारे 37)अंजली सावन पस्तापुरे 38)शहाजी भगवानराव पाटील 39)गोकर्ण गणेश गायकवाड 40)पाटोदा बाळु शंकरराव यांना निवडणुन आणुनया राष्ट्रीय मराठा पार्टी यांच्याकडुन भाजपा/राष्ट्रवादी श्री अजित दादा पवार पार्टी सोबत आहोत म्हणून राष्ट्रीय मराठा पार्टीचा जाहीर पाठींबा घोषित केला आहे, या वेळेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.रामचंद्र भांगे, अखिल भारतीय मराठा महासंघ उदगीर ता.अध्यक्ष देविदास चिकले इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Image
स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, गुत्तेदारांनी वीज ग्राहकांना विनाकारण त्रास देऊ नये - स्वप्निल जाधव उदगीर = सध्या लातूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वीज कायदा 2003 च्या कलम 55 प्रमाणे स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केले आहे. वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत. ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नका, असे स्पष्ट सांगावे असेही विधीज्ञ दर्यापूरकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू होऊ शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची, परिपत्रकाची प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरल्याने विज बिल भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटल्याचे स्वप्निल जाधव यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना स्वप्निल जाधव यांनी मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालाचाही हवाला दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टने वीज ग्राहकांना स्पष्ट केले आहे की स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही. थाई स्वरूपातील मिटर घेत असतील तर त्यांच्यासाठी ते अनिवार्य आहे मात्र नियमित ग्राहकांसाठी ते अनिवार्य नाही. संदर्भात विधिज्ञ शरद जोशी यांच्या म्हणण्यानुसार वीज ग्राहकांच्या लेखी परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे हे कायद्याने अपराध ठरू शकेल जबरदस्ती करून मीटर जर कोणी बसवत असेल तर तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन कारवाई बद्दल सीहोर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत वर्मा यांनी आभार मानले आहेत, स्मार्ट मीटर बसवणे हे खाजगी कंपनीने कंत्राट घेऊन शासनाच्या काही लोकांना हाताशी धरून हे काम चालू केले आहे. भविष्यात हे मीटर रिचार्ज सिस्टीम चे होणार आहेत. त्यामुळे राज्यात त्याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसवण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्यांना ताबडतोब विरोध करावा. जीनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसवले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडे महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे. भविष्यात आपली लुबडणूक होणार नाही यासाठी जनतेने स्मार्ट मीटरला तीव्र विरोध करावा या संदर्भामध्ये काही स्वयंसेवी संस्था स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना तयार करत आहेत तशा पद्धतीचा अर्ज ग्राहकाने महावितरणला देऊन त्याची पोचपावती घ्यावी त्यासाठी सर्वांनी सावध राहावे असेही आवाहन जाधव यांनी केले आहे.
Image