कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
उदगीर नगरपालिकेत सत्ता पालट ? 👉 अनेक माजी नगरसेवकाची नाराजी भोवणार ! उदगीर:- उदगीर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून आता नामांकन दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी चालू असून काही पक्ष हवेत आहेत की आम्ही जो उमेदवार दिला तो निवडून येईल हे त्यांचे भ्रम दिसत असून जश्या निवडणूक निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तश्या प्रभागात जाऊन तेथील मतदाराच्या ही प्रतिक्रिया घेतल्या असत्या तर चांगले झाले असते असे मतदार बोलत आहेत या वरून ज्या माजी नगरसेवका बद्दल रोष आहेत त्याचा फटका अनेक पक्षाला बसण्याची शक्यता दिसत आहे,शहरात होत असलेल्या गुप्त बैठकीचा सारांश घेतला तर ज्या पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार सक्षम असेल त्याचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे दिसत असून पुढील दोन दिवसात हे स्पष्ट होईल
ठरलं भाजप राष्ट्रवादी ? नगराध्यक्ष भाजप, भाजप 18 राष्ट्रवादी 19 अन्य 3 फॉर्म्युला? उदगीर:- उदगीर नगरपालिका निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांची युती संदर्भात फायनल बैठक झाल्याची चर्चा असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पद भाजप ला तर त्या बद्दल राष्ट्रवादी ला एक नगरसेवक जास्त असल्याची चर्चा सूत्र करत आहेत तर राष्ट्रवादी ला प्रभाग 1,2,3,4,5,6,10,11,12 आणि 13 तर भाजप ला प्रभाग 7,8,9,14,15,16,17,19,20 मिळेल अशी चर्चा आहे,तर 18 मधून 2, 20 मधून 1 ही जागा अन्य देण्यात येईल अशी ही सूत्रांची माहिती असून हा अंदाज आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे , होऊ शकते उदगीर समाचार चा अंदाज खरा ठरतो किंवा खोटा हे लवकरच समजेल
भ्रूण हत्या कलंक, अब बहु के लिए तरसना पड़ रहा है :- भागवताचार्य प. पु. भागीरथजी सारस्वत उदगीर:- मानवत में गिरधारीलाल जी अरुणजी काबरा परिवार की और से आयोजित भागवत कथा के पंचम दिवस पर आचार्य श्री ने समाज को हिदायत देते कहा कि आप जो अन्य को दोगे वह दुगना होकर आपको मिलेगा,आनंद दो आनंद मिलेगा लेकिन पिछले अनेक सालों से जो भ्रूण हत्या हुई है उसका फल समाज को मिल रहा है, बहुएं नहीं मिलने से अनेक परिवार दुखी हैं,दोस्ती ऐसे से करो जो सही है लेकिन आज दोस्तो की वजह से अनेक बर्बाद हो रहे हैं,भागवत कथा ज्ञान विज्ञान का संगम है आपको जितना पढ़ना है पढ़ो लेकिन धर्म और संस्कार भूलो मत,परंपरा संभालो,परंपरा लुप्त हो रही हैं,लुप्त होने के बाद मिलने वाली नहीं, गाय हमारी माता है लेकिन इस युग में गाय को छोड़ कुत्ते पाले जा रहे है यह शोकांतिका है,आज के कथा में आचार्य श्री ने बालकृष्ण लीला, गोवर्धन पूजन,रुक्मिणी स्वयंवर रचाया,आचार्य श्री ने अपने मधुर वाणी से सभी भागवत प्रेमी को मंत्रमुग्ध किया
Image
प. पू. श्री गोविंददेवजी गिरीजी महाराज यांचे उदगीर नगरीत भव्य स्वागत उदगीर:- उदगीर नगरीत आज श्री राम मंदिर अयोध्याचे चे कोषाध्यक्ष प .पू. श्री गोविंददेवजी गिरी जी यांचे उदगीर रेल्वे स्थानकावर आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले, एक्या बँकेचा शुभारंभ श्री गोविंददेव जी गिरीजा यांच्या हस्ते होत आहे,पश्चात भगीरथ मंगल कार्यालयात आज सकाळी 10 -30 वाजता त्यांचे प्रवचन होणार असून याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन लक्ष्मीनारायण लोया,जगदीश बाहेती यांनी केले आहे
Image
आदर्श पुरस्कार प्राप्त लाचखोर तलाठी अमोल रामशेट्टी वर गुन्हा दाखल 👉15 आर जमिनीच्या फेरफारासाठी मागितले 40 हजार ,लाच मागितल्याचा गुन्हा नोंद. उदगीर= उदगीर तालुक्यातील निडेबन महसूल विभागाचे तत्कालीन तलाठी तथा नळेगाव येथे कार्यरत अमोल रामशेट्टी वर नळेगाव येथील शेतकऱ्यास 40 हजाराची लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून या तलाठ्याने निडेबन येथील कार्यकाळात करोडो रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याची चर्चा असून यांनी अनेक कारणामेही केल्याचे लोक बोलत आहेत आरोपी तलाठी अमोल रामशेट्टे, पद- ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), नेमणूक तलाठी कार्यालय, नळेगाव ता. चाकुर जि. लातूर गट - क विरुद्ध लाच लुचपत विभाग लातूर येथे दि. 10/10/2025 रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली कि, तक्रारदार व त्यांचा भाऊ नफिस यांनी मौजे नळेगाव येथील गट नंबर 827/01 मधील खरेदी केलेली व कोर्ट डिक्री केलेली प्रत्येकी 0 हेक्टर 10 आर जमिनीची फेरफार नोंद करण्या करिता लोकसेवक अमोल रामशेट्टे यांनी तकारदार यांच्याकडे 35,000/- रू. लाचेची मागणी करत आहेत. पडताळणी केली असता दिनांक 14.10.2025 रोजी 14.24 वाजता तलाठी कार्यालय, नळेगाव ता. चाकुर येथे लोकसेवक अमोल रामशेट्टे यांनी तक्रारदार यांचे प्रलंबीत कामासाठी पंचासमक्ष 40,000/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती 39,000/- रू स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले व सदर लाच रक्कम तलाठी कार्यालयात काम करणारा खाजगी व्यक्ती सदा यांच्याकडे देण्यास सांगितले, लोकसेवक अमोल रामशेट्टे यांनी तक्रारदार यांचे प्रलंबीत कामासाठी 39,000/-रू. लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम ही खाजगी व्यक्ती सदा यांचेकडे देण्यास सांगितली होती त्यावरून दि. 14/10/2025, दि.15/10/2025 व दि. 28/10/2025 रोजी लाच स्विकृती सापळा आजमावला असता लोकसेवकास तक्रारदाराचा संशय आल्याने अमोल रामशेट्टे व खाजगी व्यक्ती सदा यांनी लाच रक्कम स्विकारली नाही. त्यांच्या विरुद्ध पो.स्टे.चाकुर, जिल्हाः लातूर गुन्हा रजि. नं.575/2025 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988.प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अधिकारी करत असून,संबंधित तलाठ्याची मालमत्तेची चौकशी एस आय टी मार्फत करावी जेणे करून याने किती भ्रष्ट मालमत्ता जमवली हे उघड होईल अशी ही चर्चा तसील परिसरात लोक करत असल्याचे दिसून येत आहे
Image
दादा वर्षातून दोनदा तरी उदगीर ला या= जनतेची मागणी 👉 काय ती झाड,काय ती सफाई ,मुख्याधिकारी साहेब कधीतरी गल्लीत ही फेर फटका मारून गल्ली ची अवस्था बघा, उखडलेले रस्ते बघा ,या रस्त्यावरून जनता कशी वावरत असेल तेही बघा उदगीर= डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या उद्घाटनानिमित राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री अजित पवार 30 ऑक्टोबर रोजी उदगीर येथे येत असल्याने रातोरात शहरातील मुख्य रस्त्या वरील दुभाजकावरील मोठे मोठे झाडे तोडून तेथे शोभिवंत झाडे लावले गेले ,झाडे लाऊन झाल्यावर त्या झाडाना पाणी कधी कुणी घातले हे त्यांनाच माहीत पण यांची लाज वरून राजानी राखली,दादा येणार म्हणून मुख्य सडकेवरील दुभाजकास रंग रंगोटी तर झालीच पाहिजे, सफाई एकदम झकास होणारच यात कुठलीही शंका नसून असे जर दादा वर्षातून दोन वेळेस उदगीरात आले तर उदगीर शांघाई होईल असे जनतेस वाटत असून ,दादा तुम्ही वर्षातून दोनदा तरी उदगीर ला यावे अशी चर्चा जनता चौका चौकात करत आहेत,सोबतच दादांनी मुख्य रस्ता सोडून गल्ली बोळात ही येऊन कार्यकर्त्यांना भेटले तर गल्ली बोळात ही वैभव दिसेल असे ही मत जनता मांडत आहे